शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

४८६ ग्रामपंचायतीत ‘नवा गडी नवा राज’

By admin | Updated: May 4, 2015 00:15 IST

गावाची सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये संख्याबळ जुळविण्याचे ...

६ व ७ मे रोजी सरपंचाची निवड : संख्याबळ जुळविण्यासाठी डावपेचयवतमाळ : गावाची सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये संख्याबळ जुळविण्याचे डावपेच आखले जात आहे. येत्या ६ व ७ मे रोजी जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये नवा गडी नवा राज सुरू होणार आहे. सरपंचपदाच्या निवडीसाठी दोन हजार ८४७ विजयी ग्रामपंचायत सदस्यांना तहसीलदारांनी पत्र पाठविले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक आणि २४ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी पार पडली. २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले. अनेक गावात प्रस्थापितांना हादरे बसले. नवख्यांंना संधी मिळाली. आता सरपंच पदाची निवडणूक होऊ घातली असून यात तरी आपले वर्चस्व रहावे म्हणून प्रस्थापित हालचाली करताना दिसत आहे. संख्याबळाचे गणित आखणे सुरू आहे. अशातच निवडणूक विभागाने ७ व ८ मे रोजी कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी ६ व ७ मे हे दोन दिवस निश्चित केले आहे.सरपंच पदाची निवडीची तारीख निश्चित होताच पुन्हा ग्रामीण वातावरण ढवळून निघाले आहे. गावगाड्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे. संख्याबळ जुळविण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहे. ज्या ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. अशा ठिकाणच्या सदस्याला फितविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आमच्या पॅनलच्या बाजूने मतदान केल्यास सरपंच अथवा उपसरपंच पदाचे आमिष दिले जात आहे. एकंदरित जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीमध्ये आता नवा गडी नवा राज येणार असून प्रत्येक गावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र आरक्षणामुळे आधीच ठरलेल्या सरपंच पदाच्या उमेदवारामुळे अनेक गावात ही उत्सुकता दिसत नाही. (शहर वार्ताहर)