शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:34 IST

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.

ठळक मुद्दे४२ कोटींचा निधी वळता : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.विमा काढताना आॅनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. ही कसरत पार करून अडीच लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. यानंतर अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर ४८ हजार शेतकऱ्यांचा डाटा मिसमॅच झाला होता. यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा निरंक अहवाल बँकांना सादर झाला. यामुळे शेतकरी संतापले होते. त्यांच्या महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना विमा मिळाला असताना आपण का वगळल्या गेलो याच्या तक्रारी बँकापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणात बँकांनी सतत दोन महिने पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीने मदत दिली नाही. शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फेरअहवाल मागविला. त्यांचे दस्ताऐवज तपासून मदतीची रक्कम जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ४२ कोटींचा निधी विमा कंपनीने बँकांकडे वळता केला. यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे.मागील चार वर्षांपासून शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळला जात आहे. अशातच ४८ हजार शेतकरी पीक विम्यापासून तर काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले होते. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच या लाभ पोहोचणार आहे.दुष्काळी मदत मिळण्याचेही संकेत२०१६ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी स्थितीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून जवळपास ९१ लाखांची मदत मिळणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी