शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:34 IST

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.

ठळक मुद्दे४२ कोटींचा निधी वळता : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.विमा काढताना आॅनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. ही कसरत पार करून अडीच लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. यानंतर अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर ४८ हजार शेतकऱ्यांचा डाटा मिसमॅच झाला होता. यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा निरंक अहवाल बँकांना सादर झाला. यामुळे शेतकरी संतापले होते. त्यांच्या महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना विमा मिळाला असताना आपण का वगळल्या गेलो याच्या तक्रारी बँकापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणात बँकांनी सतत दोन महिने पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीने मदत दिली नाही. शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फेरअहवाल मागविला. त्यांचे दस्ताऐवज तपासून मदतीची रक्कम जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ४२ कोटींचा निधी विमा कंपनीने बँकांकडे वळता केला. यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे.मागील चार वर्षांपासून शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळला जात आहे. अशातच ४८ हजार शेतकरी पीक विम्यापासून तर काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले होते. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच या लाभ पोहोचणार आहे.दुष्काळी मदत मिळण्याचेही संकेत२०१६ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी स्थितीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून जवळपास ९१ लाखांची मदत मिळणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी