शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:34 IST

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.

ठळक मुद्दे४२ कोटींचा निधी वळता : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.विमा काढताना आॅनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. ही कसरत पार करून अडीच लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. यानंतर अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर ४८ हजार शेतकऱ्यांचा डाटा मिसमॅच झाला होता. यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा निरंक अहवाल बँकांना सादर झाला. यामुळे शेतकरी संतापले होते. त्यांच्या महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना विमा मिळाला असताना आपण का वगळल्या गेलो याच्या तक्रारी बँकापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणात बँकांनी सतत दोन महिने पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीने मदत दिली नाही. शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फेरअहवाल मागविला. त्यांचे दस्ताऐवज तपासून मदतीची रक्कम जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ४२ कोटींचा निधी विमा कंपनीने बँकांकडे वळता केला. यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे.मागील चार वर्षांपासून शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळला जात आहे. अशातच ४८ हजार शेतकरी पीक विम्यापासून तर काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले होते. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच या लाभ पोहोचणार आहे.दुष्काळी मदत मिळण्याचेही संकेत२०१६ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी स्थितीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून जवळपास ९१ लाखांची मदत मिळणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी