शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नव्या निकषानुसार भरणार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची ४४०७ पदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:10 IST

विशेष कार्यकारी अधिकारी: समिती गठित

पवन लताड लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांमार्फत प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. नव्या निकषानुसार जिल्ह्यात अंदाजे चार हजार ४०७विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात २००७ मध्ये विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले होते. त्यानंतर त्यात सातत्याने सुधारणा केल्या. २०१५ मध्ये विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शासनाने या कारवाईनंतर विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांबाबत सुधारित आदेश जारी केले होते. परंतु, राज्यात विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांबाबत कारवाईच झाली नाही. दरम्यान, २०२३ मध्ये युती सरकारने नियुक्तीचे सुधारित निकष आणि कार्यपद्धतीबाबत आदेश काढले.

अलीकडेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याबाबत जाहीर केले. त्यासाठी नियमावली जारी केली असून, प्रत्येक जिल्ह्यात एक हजार मतदारांमागे दोन याप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार आहेत. जिल्ह्यात २२ लाख ५२ हजार १७१ मतदार आहेत. या संख्येनुसार अंदाजे चार हजार ४०७ पदे भरली जाण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरावर आलेले प्रस्ताव शासनाने नेमलेल्या समितीकडे पाठविले जाणार आहे.

अशी राहणार जबाबदारीनियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना रहिवासी प्रमाणपत्र देणे, शासकीय कामात पंच, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य करणे, ग्रामीण भागात चोरी, शांतता भंग आदी प्रकरणांत पोलिसांना सहकार्य करणे अशा जबाबदाऱ्या दिल्या जातील.

पालकमंत्र्यांची शिफारसविशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेत समिती राहणार आहे. जिल्हास्तरावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या प्रस्तावांवर कार्यवाही केली जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनेच ही पदे भरावी, असे शासनाचे निर्देश आहेत. शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

५०० मतदारांमागे एक पद शासनाकडून पूर्वी एक हजार मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी या सूत्रानुसार पदे भरण्यात आली होती. परंतु, नव्या निकषानुसार ५०० मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यात वणी २८६०२५, राळेगाव २८८०१५, यवतमाळ ३७१२७९, दिग्रस ३४५८६९, आर्णी ३२२०२३, पुसद ३२१८२६ तर उमरखेड विधानसभेची ३१७१३४ मतदारसंख्या आहे.

१ हजार मतदारांमागे दोन विशेष कार्यकारी अधिकारीशासनाने विशेष कार्यकारी पदे भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नियुक्तीची आस लागली आहे. नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत.

"विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. जिल्ह्यात प्रस्ताव आलेले नाहीत."- डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ