शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:46 IST

यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : यवतमाळ नगरपरिषदेकडे जिल्हा वाहतूक शाखेचा साडेसहा लाखांचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पालकमंत्री मदन येरावार यांना सादर करण्यात आला असून या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी मागितला जाणार आहे.यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व त्यांच्या चमूकडून सुरु आहे. रात्री १० पर्यंत वाहतूक पोलीस पार्किंगमधील बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसत आहे. परंतु वाहतूक पोलिसांपुढेही अनेक अडचणी आहेत. शहरात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी व बाजारपेठेत पिवळे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई करताना जनतेच्या रोषाचा सामना वाहतूक पोलिसांना करावा लागतो. अशीच स्थिती चौकाचौकातील सिग्नलवर पांढºया पट्यांबाबत आहेत. अनेक ठिकाणी पिवळे व पांढरे पट्टे पुसले गेलेले आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी सूचना फलक, साईन बोर्ड लावले गेलेले नाही. जिथे कुठे असतील त्या बोर्डांची साईज बरीच लहान आहे. त्यामुळे ते वाहनधारकांच्या सहज दृष्टीस पडत नाही. काही ठिकाणी नो-एन्ट्री, प्रवेशास मनाई असे स्पष्ट लिहिण्याऐवजी केवळ ओळख चिन्ह काढले आहे. त्यावरून सामान्य नागरिकाला बोध होत नाही. बहुतांश दत्त चौकात हा प्रकार होतो. एक दिशा मार्गाचा फलक अगदीच लहान व चिन्हांकीत असल्याने नवख्या वाहनधारकाचा गोंधळ उडतो व त्याला वाहतूक पोलिसाच्या चालानच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सूचना फलक, पट्टे याबाबत वाहतूक पोलिसांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे वारंवार पत्र दिले. वैयक्तिक संपर्क साधून पाठपुरावा केला. मात्र अद्यापही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागतो आहे.कुणीही अधिकारी वाहतूक शाखेत आला तरी दीड-दोन वर्ष राहील, त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था केवळ अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी शिस्त लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस शाखेने सुमारे ४४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. या निधीतून संपूर्ण यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सूचना फलके, साईन बोर्ड व इतर व्यवस्था केल्या जाणार आहेत. नगरपरिषदेलासुद्धा पिवळे व पांढऱ्या पट्ट्यांसाठी साडेसहा लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ४४ लाखांच्या या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आग्रही असल्याचे सांगितले जाते.दरदिवशी २०० वाहनांवर कारवाईजिल्हा वाहतूक शाखेत पूर्वी दिवसभरात सात ते दहा वाहनांवर कारवाई केली जात होती. परंतु आता हा आकडा २०० वर पोहोचला आहे. पूर्वी वातानुकुलीत वाहनातून फिरणारे पोलीस आता हा आकडा गाठण्यासाठी रात्री १० पर्यंत पायदळ फिरताना दिसत आहे. लायसन्स आणि इन्शोरन्सबाबत वाहतूक पोलीस गंभीर आहे. लायसन्स नसल्यास एक हजार रुपये व इन्शोरन्स नसल्यास २३०० रुपये दंड ठोठावला जातो आहे. त्यातही जिल्हा वाहतूक शाखा ही समाजसेवी शाखा, सुधार शाखा असल्याचे मानून ग्रामीण भागातील गोरगरीब व रुग्णालयाच्या कामाने येणाºया वाट चुकलेल्या वाहनधारकांना सुधारणेच्या सूचना देऊन सोडून दिले जात आहे.