शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित

By admin | Updated: October 16, 2016 00:55 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.

परतीचा पाऊस : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.सप्टेंबर अखेर आणि आॅक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. शेंगांमधील सोयाबिनला जागीच कोंब फुटले. काही शेंगा गळून पडल्या. शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. यामुळे ऐन सणांच्या दिवसांत बळीराजाच्या चेहऱ्यावरील हसू हिरावले. तब्बल ४२ हजार हेक्टवरील सोयाबीन पावसाने बाधीत झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यांना मोठा फटका बसला. यातून सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने सरसकट मदत द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पारित केला आहे. तथापि अद्याप शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतेही धोरण जाहीर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. तथापी अद्याप शासनाने किंवा विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. (शहर प्रतिनिधी)सोयाबीन बाजारात येताच दरही गडगडलेसोयाबीन बाजार येताच व्यापाऱ्यांनी दरही पाडले आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन हजार ५०० ते चार हजार रुपये प्रति क्ंिवटल दर मिळाला होता. यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच किमान १८०० ते २४०० रुपये प्रमाणे प्रति क्ंिवटल दर मिळत आहे. शासनाने सोयाबीनचा हमी दर प्रति क्ंिवटल दोन हजार ७७५ रुपये ठरविला आहे. मात्र हमी दरापेक्षाही कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. दसरा आणि दिवाळी सणात सोयाबीन विकूनच शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येते. मात्र यावर्षी दर गडगडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळी जेमतेम १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अद्याप शेतात कापूसही फुटलेला नाही. सोयाबीनला भावही मिळत नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.