शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित

By admin | Updated: October 16, 2016 00:55 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.

परतीचा पाऊस : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.सप्टेंबर अखेर आणि आॅक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. शेंगांमधील सोयाबिनला जागीच कोंब फुटले. काही शेंगा गळून पडल्या. शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. यामुळे ऐन सणांच्या दिवसांत बळीराजाच्या चेहऱ्यावरील हसू हिरावले. तब्बल ४२ हजार हेक्टवरील सोयाबीन पावसाने बाधीत झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यांना मोठा फटका बसला. यातून सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने सरसकट मदत द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पारित केला आहे. तथापि अद्याप शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतेही धोरण जाहीर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. तथापी अद्याप शासनाने किंवा विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. (शहर प्रतिनिधी)सोयाबीन बाजारात येताच दरही गडगडलेसोयाबीन बाजार येताच व्यापाऱ्यांनी दरही पाडले आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन हजार ५०० ते चार हजार रुपये प्रति क्ंिवटल दर मिळाला होता. यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच किमान १८०० ते २४०० रुपये प्रमाणे प्रति क्ंिवटल दर मिळत आहे. शासनाने सोयाबीनचा हमी दर प्रति क्ंिवटल दोन हजार ७७५ रुपये ठरविला आहे. मात्र हमी दरापेक्षाही कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. दसरा आणि दिवाळी सणात सोयाबीन विकूनच शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येते. मात्र यावर्षी दर गडगडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळी जेमतेम १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अद्याप शेतात कापूसही फुटलेला नाही. सोयाबीनला भावही मिळत नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.