शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दुष्काळी मदतीचे ३७ कोटी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 16, 2015 01:51 IST

खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही.

रूपेश उत्तरवार यवतमाळ खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेले ३७ कोटी रुपये परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कापूस आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ९७३ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे दोन टप्प्यात बँक खात्यात जमा करण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासनाकडे निधी आल्यानंतर ८२ हजार ७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागत नव्हता. या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यात जमा करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. शेतकऱ्यांची बँक खाती शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. मात्र त्यांनाही या खात्याचा शोध लागला नाही. त्यामुळे जिल्ह्यात तीन लाख ६४ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या खात्यात २०८ कोटी २० लाख ४५ हजार ६२३ रुपये वळते केले. तर ३७ कोटी ४४ लाख ४५ हजार ६२३ रुपये संबंधित तहसीलदारांच्या खात्यात आहे. विशेष म्हणजे ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बँक खात्यात निधी वळता झाला नाही तर हा निधी शासनाच्या तिजोरीत परत जाणार आहे.