शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

दुष्काळी मदतीचे ३७ कोटी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 16, 2015 01:51 IST

खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही.

रूपेश उत्तरवार यवतमाळ खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेले ३७ कोटी रुपये परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कापूस आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ९७३ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे दोन टप्प्यात बँक खात्यात जमा करण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासनाकडे निधी आल्यानंतर ८२ हजार ७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागत नव्हता. या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यात जमा करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. शेतकऱ्यांची बँक खाती शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. मात्र त्यांनाही या खात्याचा शोध लागला नाही. त्यामुळे जिल्ह्यात तीन लाख ६४ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या खात्यात २०८ कोटी २० लाख ४५ हजार ६२३ रुपये वळते केले. तर ३७ कोटी ४४ लाख ४५ हजार ६२३ रुपये संबंधित तहसीलदारांच्या खात्यात आहे. विशेष म्हणजे ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बँक खात्यात निधी वळता झाला नाही तर हा निधी शासनाच्या तिजोरीत परत जाणार आहे.