शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दुष्काळी मदतीचे ३७ कोटी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 16, 2015 01:51 IST

खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही.

रूपेश उत्तरवार यवतमाळ खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेले ३७ कोटी रुपये परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कापूस आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ९७३ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे दोन टप्प्यात बँक खात्यात जमा करण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासनाकडे निधी आल्यानंतर ८२ हजार ७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागत नव्हता. या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यात जमा करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. शेतकऱ्यांची बँक खाती शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. मात्र त्यांनाही या खात्याचा शोध लागला नाही. त्यामुळे जिल्ह्यात तीन लाख ६४ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या खात्यात २०८ कोटी २० लाख ४५ हजार ६२३ रुपये वळते केले. तर ३७ कोटी ४४ लाख ४५ हजार ६२३ रुपये संबंधित तहसीलदारांच्या खात्यात आहे. विशेष म्हणजे ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बँक खात्यात निधी वळता झाला नाही तर हा निधी शासनाच्या तिजोरीत परत जाणार आहे.