शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्दे जनजागृतीवर प्रश्नचिन्ह, सुरक्षा किटची प्रतीक्षाचपुन्हा मृत्यूचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन-तीन वर्षांपूर्वी पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन ८८६ शेतकऱ्यांना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. तर २२ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने फवारणी कशी करावी यावर जनजागृती सुरू केली. मात्र या जनजागृतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.कीटकनाशक फवारणीतून विषबाधा व मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. आधीच कर्ज व नापिकीपायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. त्यात कीटकनाशक फवारणीने शेतकऱ्यांपुढे आणखी संकट निर्माण झाल्याने राज्य सरकार व प्रशासनाचा संपूर्ण फोकस यवतमाळवर निर्माण झाला होता. त्यातूनच कृषी विभागाला शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची जबाबदारी दिली गेली. तर कृषी क्षेत्रातील कंपन्यांना शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरविण्यास सांगण्यात आले होते.

पहिली दोन वर्ष कंपन्यांनी सुरक्षा किट बऱ्यापैकी वाटपही केले. मात्र लाखो शेतकरी आणि किट हजारात अशी तफावत त्यात निर्माण झाली. आता तर कृषी विभागाची जनजागृती आणि किट वाटपही चांगलेच थंडावले. त्यामुळेच की काय ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा पुन्हा सुरू झाली आहे. आतापर्यंत ३६ शेतकऱ्यांना ही बाधा झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दप्तरी नोंद आहे. त्यातील १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे.कृषी विभाग व कंपन्या शेतकरी, शेतमजुरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवतात. शेतकरी पुरेशी काळजी घेत नाही, तोंडाला रुमाल बांधत नाही, फवारणीच्याच हाताने तंबाखू घोटतात, उघड्या अंगाने फवारणी करतात आदी शेतकऱ्यांचे दोष दाखविले जातात. परंतु प्रत्यक्षात त्यात वास्तव नाही. पीक लहान असताना शेतकरी व्यवस्थित फवारणी करतो.

परंतु आता कपाशीची उंची माणसापेक्षाही वाढली आहे. अशा स्थितीत कीटकनाशक फवारणी करताना हात वर न्यावा लागतो व त्यातूनच फवारा चेहऱ्यावर उडतो. उंची वाढलेल्या पिकांवर फवारणी करताना नेमकी सुरक्षा किटची अधिक आवश्यकता असते. मात्र शेतकऱ्यांकडे या किट पुरेशा प्रमाणात पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. त्यातूनच विषबाधा प्रकरणे वाढत आहे. कृषी विभागाने आत्ताच याची दखल घेऊन जनजागृती व किट वाटप न केल्यास लगतच्या भविष्यात विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या आणखी वाढण्याची व त्यातून मृत्यूचे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सिम्बॉलची माहितीच नाहीअनेक प्रकारचे औषधी एकत्र केल्यानंतर त्याचे जहाल औषधी तयार होते. मात्र प्रत्येक औषधांची स्वतंत्र फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी अशा पध्दतीने फवारणी करतात. कुठले औषध किती घातक याचे प्रमाण दर्शविणारे सिम्बॉल औषधांवर असतात. यात रेड ठिपका अतिघातक स्वरूपाचे औैषध म्हणून वापरला जातो. पिवळ्या रंगाचा ठिपका त्यापेक्षा कमी घातक तर ग्रीन ठिपका सर्वाधिक सुरक्षित औषधांसाठी वापरला जातो. ज्या शेतकºयांना इंग्रजी वाचता येत नाही अशा शेतकऱ्यांना हा सिम्बॉल घातकता दर्शवितो. मात्र याची माहिती अजूनही कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जात नाही. यामुळे शेतकरी फवारणी करताना बिनधास्त असतात.

टॅग्स :Farmerशेतकरी