शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्दे जनजागृतीवर प्रश्नचिन्ह, सुरक्षा किटची प्रतीक्षाचपुन्हा मृत्यूचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन-तीन वर्षांपूर्वी पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन ८८६ शेतकऱ्यांना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. तर २२ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने फवारणी कशी करावी यावर जनजागृती सुरू केली. मात्र या जनजागृतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.कीटकनाशक फवारणीतून विषबाधा व मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. आधीच कर्ज व नापिकीपायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. त्यात कीटकनाशक फवारणीने शेतकऱ्यांपुढे आणखी संकट निर्माण झाल्याने राज्य सरकार व प्रशासनाचा संपूर्ण फोकस यवतमाळवर निर्माण झाला होता. त्यातूनच कृषी विभागाला शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची जबाबदारी दिली गेली. तर कृषी क्षेत्रातील कंपन्यांना शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरविण्यास सांगण्यात आले होते.

पहिली दोन वर्ष कंपन्यांनी सुरक्षा किट बऱ्यापैकी वाटपही केले. मात्र लाखो शेतकरी आणि किट हजारात अशी तफावत त्यात निर्माण झाली. आता तर कृषी विभागाची जनजागृती आणि किट वाटपही चांगलेच थंडावले. त्यामुळेच की काय ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा पुन्हा सुरू झाली आहे. आतापर्यंत ३६ शेतकऱ्यांना ही बाधा झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दप्तरी नोंद आहे. त्यातील १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे.कृषी विभाग व कंपन्या शेतकरी, शेतमजुरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवतात. शेतकरी पुरेशी काळजी घेत नाही, तोंडाला रुमाल बांधत नाही, फवारणीच्याच हाताने तंबाखू घोटतात, उघड्या अंगाने फवारणी करतात आदी शेतकऱ्यांचे दोष दाखविले जातात. परंतु प्रत्यक्षात त्यात वास्तव नाही. पीक लहान असताना शेतकरी व्यवस्थित फवारणी करतो.

परंतु आता कपाशीची उंची माणसापेक्षाही वाढली आहे. अशा स्थितीत कीटकनाशक फवारणी करताना हात वर न्यावा लागतो व त्यातूनच फवारा चेहऱ्यावर उडतो. उंची वाढलेल्या पिकांवर फवारणी करताना नेमकी सुरक्षा किटची अधिक आवश्यकता असते. मात्र शेतकऱ्यांकडे या किट पुरेशा प्रमाणात पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. त्यातूनच विषबाधा प्रकरणे वाढत आहे. कृषी विभागाने आत्ताच याची दखल घेऊन जनजागृती व किट वाटप न केल्यास लगतच्या भविष्यात विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या आणखी वाढण्याची व त्यातून मृत्यूचे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सिम्बॉलची माहितीच नाहीअनेक प्रकारचे औषधी एकत्र केल्यानंतर त्याचे जहाल औषधी तयार होते. मात्र प्रत्येक औषधांची स्वतंत्र फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी अशा पध्दतीने फवारणी करतात. कुठले औषध किती घातक याचे प्रमाण दर्शविणारे सिम्बॉल औषधांवर असतात. यात रेड ठिपका अतिघातक स्वरूपाचे औैषध म्हणून वापरला जातो. पिवळ्या रंगाचा ठिपका त्यापेक्षा कमी घातक तर ग्रीन ठिपका सर्वाधिक सुरक्षित औषधांसाठी वापरला जातो. ज्या शेतकºयांना इंग्रजी वाचता येत नाही अशा शेतकऱ्यांना हा सिम्बॉल घातकता दर्शवितो. मात्र याची माहिती अजूनही कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जात नाही. यामुळे शेतकरी फवारणी करताना बिनधास्त असतात.

टॅग्स :Farmerशेतकरी