शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

नगरसेवक पदांसाठी ३४१ नामांकन

By admin | Updated: October 29, 2016 00:12 IST

नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांत नगरसेवक पदासाठी ३४१ नामांकन दाखल झाले असून,

आज अखेरचा दिवस : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक, यवतमाळात १२६ अर्जयवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांत नगरसेवक पदासाठी ३४१ नामांकन दाखल झाले असून, शनिवार ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने अर्जाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच नामांकन दाखल करण्याची वेळ एक तासाने वाढवून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक होऊ घातली असून, २४ आॅक्टोबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला. सुरूवातीच्या दोन दिवसात एकही नामांकन दाखल झाले नाही. २६ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात १२ नामांकन तर २७ आॅक्टोबर रोजी ६० नामांकन दाखल झाले. शुक्रवारी नामांकन दाखल करण्याला वेग आला. शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल २६९ नामांकन दाखल झाले. यवतमाळ नगरपरिषदेत आतापर्यंत १२६ नामांकन दाखल झाले आहे. वणी २४, पुसद ४६, दिग्रस ४५, उमरखेड ३४, दारव्हा ३२, आर्णी १९ आणि घाटंजीत १५ नामांकन दाखल झाले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत आतापर्यंत अध्यक्षपदासाठी दोघांनी नामांकन दाखल केले असून, शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. शनिवार ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने एक तास वेळ वाढून दिला आहे. आता उमेदवारांना ४ वाजेपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. जिल्ह्यात सर्वात कमी नामांकन घाटंजी नगरपरिषदेसाठी दाखल झाले आहे. १७ जागांसाठी केवळ १५ नामांकन आले. त्यामुळे शेवटच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)