शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:41 IST

विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १०४ परीक्षा केंद्र : कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथकांसह बैठ्या पथकांची राहणार नजर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. २१ फेब्रुवारीला पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असून विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागही सज्ज झाला आहे.उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यात बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदाही कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पुढाकरात तयारी पूर्ण झाली असून १०४ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या केंद्रांवर यंदा एकंदर ३४ हजार ११९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३१ हजार ८०६ इतके नियमित परीक्षार्थी असून २ हजार ३१३ विद्यार्थी ‘रिपीटर’ म्हणून परीक्षेला बसणार आहे.विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी यंदा प्रत्येक केंद्रावर बैठे पथक देण्यात येणार आहे. या पथकात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच सहा भरारी पथके संपूर्ण जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहेत. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २ निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १ आणि डायट प्राचार्यांच्या नेतृत्वात १ अशी सहा भरारी पथके राहणार आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून पथकातील अधिकारी आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्राचे मोबाईलद्वारे शूटिंग करणार आहेत.तालुकानिहाय परीक्षा केंद्रजिल्ह्यात एकंदर १०४ परीक्षा केंद्र आहेत. त्यात यवतमाळ तालुक्यात १५, नेर ४, दारव्हा ७, दिग्रस ५, आर्णी ७, पुसद १२, उमरखेड ७, महागाव ८, बाभूळगाव ५, कळंब ५, राळेगाव ४, मारेगाव २, पांढरकवडा ८, झरी ३, वणी ७, तर घाटंजी तालुक्यात ५ केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च अशी महिनाभर परीक्षा चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत इंग्रजीचा पेपर आहे. परीक्षार्थ्यांनी अर्धा तास आधीच केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षा