शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद

By admin | Updated: April 25, 2015 23:58 IST

तालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी भटकंती : उमरखेड तालुक्यात कोट्यवधी पाण्यातअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद असून अनेक नळयोजनांचे काम अपूर्ण आहे. परिणामी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी विहीर आणि हातपंपाचा आधार घ्यावा लागतो.जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत उमरखेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या नळयोजना राबविण्यात आल्या. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाडी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राह्मणगाव, चातारी, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. १५ कोटी रुपयांच्या या नळयोजनेकडे पंचायत समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे.अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी नळयोजनांचा बोजवारा उडाला आहे. एवढेच नाही तर बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भांबरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या नळयोजना कायमस्वरूपी बंद पडल्या आहे. त्याचप्रमाणे ढाणकी येथील नळयोजना बंद आहे. कारखेडला ४० लाख, भांबरखेडला आठ लाख, गोविंदपूर, मरसूळ, मुरली या गावांना आठ लाख असे ७२ लाख रुपयांची नळयोजनेची कामे अर्धवट आहे. या योजनावर उमरखेड पंचायत समितीने कुठलाही अंकुश ठेवला नाही. त्यामुळे या नळयोजना बंद पडल्या, तर काही अर्धवट स्थितीमुळे बंद आहे.उमरखेड तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील बंदी भागातील नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. लहान-सहान कारणाने अनेक नळयोजना बंद आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नळयोजनेला चुना लागत आहे. दीड लाख नागरिकांना हातपंपाचा आधारउमरखेड तालुक्यात जवळपास ५३६ हातपंप आहे. त्यापैकी ३६ बंद आहे. उर्वरित हातपंपावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांसाठी हातपंपच आधार ठरत आहे. नळयोजना दुरुस्तीसाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुक्यातील ७२ नळयोजनांपैकी ३४ नळयोजना बंद आहे. या नळयोजना सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यातील काही नळयोजनेच्या कामांना प्रारंभ झाला आहे. इतर सर्व नळयोजनेच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.- नीलेश काळबांडे, उपअभियंता, पाणीपुरवठा, पुसद