शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद

By admin | Updated: April 25, 2015 23:58 IST

तालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी भटकंती : उमरखेड तालुक्यात कोट्यवधी पाण्यातअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद असून अनेक नळयोजनांचे काम अपूर्ण आहे. परिणामी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी विहीर आणि हातपंपाचा आधार घ्यावा लागतो.जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत उमरखेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या नळयोजना राबविण्यात आल्या. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाडी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राह्मणगाव, चातारी, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. १५ कोटी रुपयांच्या या नळयोजनेकडे पंचायत समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे.अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी नळयोजनांचा बोजवारा उडाला आहे. एवढेच नाही तर बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भांबरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या नळयोजना कायमस्वरूपी बंद पडल्या आहे. त्याचप्रमाणे ढाणकी येथील नळयोजना बंद आहे. कारखेडला ४० लाख, भांबरखेडला आठ लाख, गोविंदपूर, मरसूळ, मुरली या गावांना आठ लाख असे ७२ लाख रुपयांची नळयोजनेची कामे अर्धवट आहे. या योजनावर उमरखेड पंचायत समितीने कुठलाही अंकुश ठेवला नाही. त्यामुळे या नळयोजना बंद पडल्या, तर काही अर्धवट स्थितीमुळे बंद आहे.उमरखेड तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील बंदी भागातील नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. लहान-सहान कारणाने अनेक नळयोजना बंद आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नळयोजनेला चुना लागत आहे. दीड लाख नागरिकांना हातपंपाचा आधारउमरखेड तालुक्यात जवळपास ५३६ हातपंप आहे. त्यापैकी ३६ बंद आहे. उर्वरित हातपंपावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांसाठी हातपंपच आधार ठरत आहे. नळयोजना दुरुस्तीसाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुक्यातील ७२ नळयोजनांपैकी ३४ नळयोजना बंद आहे. या नळयोजना सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यातील काही नळयोजनेच्या कामांना प्रारंभ झाला आहे. इतर सर्व नळयोजनेच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.- नीलेश काळबांडे, उपअभियंता, पाणीपुरवठा, पुसद