शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद

By admin | Updated: April 25, 2015 23:58 IST

तालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी भटकंती : उमरखेड तालुक्यात कोट्यवधी पाण्यातअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद असून अनेक नळयोजनांचे काम अपूर्ण आहे. परिणामी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी विहीर आणि हातपंपाचा आधार घ्यावा लागतो.जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत उमरखेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या नळयोजना राबविण्यात आल्या. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाडी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राह्मणगाव, चातारी, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. १५ कोटी रुपयांच्या या नळयोजनेकडे पंचायत समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे.अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी नळयोजनांचा बोजवारा उडाला आहे. एवढेच नाही तर बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भांबरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या नळयोजना कायमस्वरूपी बंद पडल्या आहे. त्याचप्रमाणे ढाणकी येथील नळयोजना बंद आहे. कारखेडला ४० लाख, भांबरखेडला आठ लाख, गोविंदपूर, मरसूळ, मुरली या गावांना आठ लाख असे ७२ लाख रुपयांची नळयोजनेची कामे अर्धवट आहे. या योजनावर उमरखेड पंचायत समितीने कुठलाही अंकुश ठेवला नाही. त्यामुळे या नळयोजना बंद पडल्या, तर काही अर्धवट स्थितीमुळे बंद आहे.उमरखेड तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील बंदी भागातील नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. लहान-सहान कारणाने अनेक नळयोजना बंद आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नळयोजनेला चुना लागत आहे. दीड लाख नागरिकांना हातपंपाचा आधारउमरखेड तालुक्यात जवळपास ५३६ हातपंप आहे. त्यापैकी ३६ बंद आहे. उर्वरित हातपंपावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांसाठी हातपंपच आधार ठरत आहे. नळयोजना दुरुस्तीसाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुक्यातील ७२ नळयोजनांपैकी ३४ नळयोजना बंद आहे. या नळयोजना सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यातील काही नळयोजनेच्या कामांना प्रारंभ झाला आहे. इतर सर्व नळयोजनेच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.- नीलेश काळबांडे, उपअभियंता, पाणीपुरवठा, पुसद