शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

३३ मीटर रुंदीकरणाला वनखात्याची परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प्रत्येक ५० मीटरवर नव्याने रूंदी मोजण्याचे काम हाती घेतले आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याची ...

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वृक्षतोड ठरली अनधिकृत, आता भरपावसात वनअधिकाऱ्यांची फेरमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प्रत्येक ५० मीटरवर नव्याने रूंदी मोजण्याचे काम हाती घेतले आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याची रूंदी वाढविली गेली आहे. परंतु दोनही बाजूला वनखात्याची जागा असल्याने त्यात खोदकामासाठी वनविभागाची परवानगी गरजेची आहे. या महामार्गाची रूंदी ४५ मीटर अर्थात १५० फूट असल्याचे अभिलेख्यात नमूद आहे. त्यानुसार १२ ते ४५ फूट या रूंदीची वनखात्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रितसर परवानगी घेणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात त्यांनी केवळ ३० ते ४५ मीटर एवढ्याच जागेतील रूंदीकरणाची परवानगी घेतली. त्यामुळे उर्वरित ३३ मीटर जागेच्या रूंदीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष असे, या सर्व ४५ मीटर रूंदीकरणाच्या जागेत येणाऱ्या सागवान वृक्षांची तोडही करण्यात आली. या प्रकारामुळे महामार्ग प्राधिकरणच नव्हे, तर स्थानिक वनखात्याची यंत्रणाही अडचणीत आली आहे. स्थळ पंचनामा करून तत्कालीन सीसीएफने परवानगी दिल्याची नोंद आहे. मात्र त्यांचे हे परवानापत्रच आता संशयाच्या भोवºयात सापडले आहे. त्यांनी स्थळाला प्रत्यक्ष भेट दिली की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.२५ आॅक्टोबर १९८० ला असलेली महामार्गाची रूंदी ग्राह्य धरावी, असे बंधन आहे. मात्र ते बंधन झुगारून वनखात्याने आपल्या मर्जीनेच रूंदीकरणाची परवानगी दिली. विशेष असे, महामार्गाने या संपूर्ण ४५ मीटर रस्त्याच्या मालकीचा दाखलाही (२५/२) तहसीलदारांकडून मिळविलेला नाही. रस्त्याचे नियमबाह्य रूंदीकरण करताना शासनाच्या जमीनीच नव्हे तर अनेक खासगी शेतांमध्येही महामार्गाच्या कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. त्याच्या भूसंपादनाचा पैसाही सदर शेतकऱ्याला मिळालेला नाही. हे रूंदीकरण करताना केंद्र शासनाच्या १४ अटींची पूर्तता केली गेली नाही. वृक्षतोड करताना झाडोरा आगारात आणला गेला नाही. सरकारी संपत्तीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार असून त्याला स्थानिक वनयंत्रणेने अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे दिसून येते.परवानगी संशोधनाचा विषयरूंदीकरणाच्या जागेची मालकी नसताना वनखात्याने त्यावरील झाडे तोडण्याची परवानगी महामार्ग प्राधिकरणाला दिली कशी, हाच संशोधनाचा विषय आहे. रूंदीकरण व वृक्षतोड गाजत असल्याने वनखात्याने आता या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाची नव्याने मोजणी चालविली आहे. प्रत्येक ५० मीटरवर टेप लाऊन रूंदी मोजली जात आहे. भरपावसात वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी या महामार्गावर रूंदीकरणाची मोजणी करताना दिसत आहेत. यात हलगर्जीपणा करणाºया यंत्रणेवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गforest departmentवनविभाग