शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीतील ३२ हजार कंत्राटी कामगार वाऱ्यावर; कामावर असताना वर्षभरात ४१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 15:06 IST

एकीकडे नोकरी टिकून राहण्याची खात्री नाही, तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.

यवतमाळ : विद्युत कंपनीचा संपूर्ण डोलारा सांभाळणारऱ्या कंत्राटी वीज कामगारांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. विजेचा बिघाड काढण्यात आघाडीवर, वीज बिलाची वसुली करून देण्यात पुढे असलेल्या या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक विद्युत कंपनी व शासनाकडून केली जात नाही. वेतनासाठी या कामगारांना दोन दोन महिने वाट पाहावी लागते. ऊर्जा मंत्रालय आणि वीज कंपनीच्या धोरणामुळे हा कर्मचारी वर्ग अडचणीत आला असल्याची ओरड होत आहे.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिनही वीज कंपनीतील रिक्त जागांवर मागील १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करीत आहे. एकीकडे नोकरी टिकून राहण्याची खात्री नाही, तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. मागील वर्षभरात कोरोना काळात या कामगारांनी वीजेसंदर्भातील अडचणी दूर करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. विद्युत कंपनीतील कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कामे केली. राज्याला अखंडित वीज पुरवठा करत असताना ४१ कामगारांचा विविध कारणामुळे मृत्यू झाला. 

विद्युत कंपनीने मागील काही महिन्यात थकीत बिलाच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबविली. या कामासाठीही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. वीज बिलापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा झाला. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा राहिला, असे असतानाही त्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले जात आहेत. प्रामुख्याने अनियमित होत असलेल्या वेतनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आधीच तोकडे वेतन आणि त्यात आलेल्या अनियमिततेने त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. 

कर्मचाऱ्यांना रडवले जात आहे- 

विद्युत कंपनीला कामगार पुरविणाऱ्या कंत्राटदारांची मनमानी सुरू आहे. त्यांच्या सोयीच्या बँकेमध्ये खाते काढण्याची सक्ती केली जाते. ठरलेल्या पगाराइतकी रक्कम कर्मचाऱ्यांना मिळत नाही. कर्मचाऱ्यांची दूर कुठेतरी बदली करून त्रस्त केले जाते. दिवंगत झालेल्या ४१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात हात आखडता घेण्यात आला. शासनाच्या कामासाठी लढणाऱ्या या कर्मचाऱ्यांना रडवले जात आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विविध आंदोलने करण्यात आली. मात्र, ऊर्जा मंत्रालय व वीज कंपनीने दुर्लक्ष केले. आता ११ मे रोजी महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, प्रधान सचिव यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. शासनाने संघटनेशी चर्चा करावी, ही अपेक्षा आहे.- नीलेश खरात, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळelectricityवीज