शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार

By admin | Updated: May 22, 2014 01:29 IST

यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वणी : यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खते, बियाणे, तसेच विविध कृषी साहित्य खरेदीवर ही रक्कम खर्ची पडणार आहे.

वणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खत आणि बियाण्यांची विक्री होते. हा तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात उच्च दर्जाचा कापूस निर्माण होतो. सोबतच मोठय़ा प्रमाणात कीटकनाशक आणि रसायनिक खतांची शेतकरी खरेदी करतात. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३0 कोटी रुपयांची उलाढाल होते. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही रक्कम खर्ची पडते. खरीपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव हा ३0 कोटींचा खर्च करतात. पावसाचे संकेत प्रप्त झाल्याने शेतकरी बांधव आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्यात व्यस्त झाले आहे.

आता तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी आत्ताच बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकार्‍यांनी गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. याशिवाय शेतकरी आता सोयाबिनकडेही वळले आहे. सोबतच खरीपात तूर, ज्वारी आदी पिकेही घेतली जातात. तथापि कापूस हेच अद्याप नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तरीही आता सोयाबिनकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सोयाबिनलाही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जात अहे. खरीपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बियाणे बोगस, हे ओळखे कठीण असते. त्यासाठीच कृषी विभागाने गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभगाला दिल्या आहेत. त्यानुसार येथील तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वात नुकतेच हे पथक गठित करण्यात आले. त्यात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांसह काहींचा समावेश आहे. हे पथक बोगस कृषी साहित्याचा शोध घेणार आहे.

शेतकर्‍यांकडून तक्रार प्राप्त होताच हे पथक संबंधित वाणांची चौकशी करणार आहेत. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)