शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार

By admin | Updated: May 22, 2014 01:29 IST

यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वणी : यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खते, बियाणे, तसेच विविध कृषी साहित्य खरेदीवर ही रक्कम खर्ची पडणार आहे.

वणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खत आणि बियाण्यांची विक्री होते. हा तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात उच्च दर्जाचा कापूस निर्माण होतो. सोबतच मोठय़ा प्रमाणात कीटकनाशक आणि रसायनिक खतांची शेतकरी खरेदी करतात. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३0 कोटी रुपयांची उलाढाल होते. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही रक्कम खर्ची पडते. खरीपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव हा ३0 कोटींचा खर्च करतात. पावसाचे संकेत प्रप्त झाल्याने शेतकरी बांधव आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्यात व्यस्त झाले आहे.

आता तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी आत्ताच बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकार्‍यांनी गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. याशिवाय शेतकरी आता सोयाबिनकडेही वळले आहे. सोबतच खरीपात तूर, ज्वारी आदी पिकेही घेतली जातात. तथापि कापूस हेच अद्याप नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तरीही आता सोयाबिनकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सोयाबिनलाही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जात अहे. खरीपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बियाणे बोगस, हे ओळखे कठीण असते. त्यासाठीच कृषी विभागाने गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभगाला दिल्या आहेत. त्यानुसार येथील तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वात नुकतेच हे पथक गठित करण्यात आले. त्यात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांसह काहींचा समावेश आहे. हे पथक बोगस कृषी साहित्याचा शोध घेणार आहे.

शेतकर्‍यांकडून तक्रार प्राप्त होताच हे पथक संबंधित वाणांची चौकशी करणार आहेत. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)