शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार

By admin | Updated: May 22, 2014 01:29 IST

यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वणी : यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खते, बियाणे, तसेच विविध कृषी साहित्य खरेदीवर ही रक्कम खर्ची पडणार आहे.

वणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खत आणि बियाण्यांची विक्री होते. हा तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात उच्च दर्जाचा कापूस निर्माण होतो. सोबतच मोठय़ा प्रमाणात कीटकनाशक आणि रसायनिक खतांची शेतकरी खरेदी करतात. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३0 कोटी रुपयांची उलाढाल होते. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही रक्कम खर्ची पडते. खरीपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव हा ३0 कोटींचा खर्च करतात. पावसाचे संकेत प्रप्त झाल्याने शेतकरी बांधव आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्यात व्यस्त झाले आहे.

आता तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी आत्ताच बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकार्‍यांनी गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. याशिवाय शेतकरी आता सोयाबिनकडेही वळले आहे. सोबतच खरीपात तूर, ज्वारी आदी पिकेही घेतली जातात. तथापि कापूस हेच अद्याप नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तरीही आता सोयाबिनकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सोयाबिनलाही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जात अहे. खरीपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बियाणे बोगस, हे ओळखे कठीण असते. त्यासाठीच कृषी विभागाने गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभगाला दिल्या आहेत. त्यानुसार येथील तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वात नुकतेच हे पथक गठित करण्यात आले. त्यात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांसह काहींचा समावेश आहे. हे पथक बोगस कृषी साहित्याचा शोध घेणार आहे.

शेतकर्‍यांकडून तक्रार प्राप्त होताच हे पथक संबंधित वाणांची चौकशी करणार आहेत. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)