शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

२८१ कोटी कर्जाची परतफेड

By admin | Updated: April 18, 2015 02:07 IST

शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे.

यवतमाळ : शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २८१ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून कर्जाची सक्तीने वसुली केली जाऊ नये, त्यांना थकीत कर्जाचे पुढील तीन वर्षांसाठी हप्ते पाडून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक अंमलबजावणीही करीत आहे. त्याच वेळी बँकेने सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन बँकेच्या कर्ज वसुलीवर भर कायम ठेवला आहे. बँकेची यंत्रणा शेतकऱ्याच्या भेटी-गाठी घेऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करताना दिसत आहेत. शासनाच्या आदेशानुसार बँक कर्जाचे हप्ते पाडून देण्यास तयार असले तरी यामुळे शेतकऱ्याचे कसे नुकसान होते, त्याच्यावर व्याज व कर्जाचा कसा बोझा बसतो, हे पटवून दिले जात आहे. कर्जाचे हप्ते पाडणे म्हणजे आजचे संकट उद्यावर लोटण्याचा प्रकार असल्याचेही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. ही बाब पटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची वेळीच परतफेड करून शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. त्यातूनच बँकेच्या तब्बल २८१ कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने परतफेड केली आहे. आजही जिल्हा बँकेत दररोज ७० ते ८० लाख रुपयांच्या कर्जाची वसुली होते आहे. गेल्या वर्षी बँकेने ३५८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते. यातील आतापर्यंत २६१ कोटी रुपये वसूल झाले आहे. आणखी ८० ते ९० कोटींची वसुली पुढील तीन महिन्यात होण्याची अपेक्षा बँक व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. कारण शेतकऱ्यांच्या कर्ज परतफेडीला जूनपर्यंत तीन महिन्याची मुदत वाढवून दिली गेली आहे. वास्तविक बँकेला ९०० कोटी रुपयांच्या कर्ज परतफेडीची अपेक्षा आहे. यातील ३५८ कोटी पीक कर्जाचे आहे. तर ४२३ कोटी रुपयांची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे. या थकीत रकमेपैकी केवळ २० कोटी रुपये यावर्षी वसूल झाले आहे. त्यात अनेक मुदती कर्जांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)