शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

विश्वशांतीचा संदेश घेऊन सलग २६ वर्षांची पदयात्रा

By admin | Updated: April 28, 2016 02:27 IST

विश्वशांतीच्या संदेश घेऊन ३० जुलै १९८० मध्ये सुरू केलेली पदयात्रा अजूनही चालूच आहे.

१९८० सुरुवात : दहा देशांतून भ्रमंतीयवतमाळ : विश्वशांतीच्या संदेश घेऊन ३० जुलै १९८० मध्ये सुरू केलेली पदयात्रा अजूनही चालूच आहे. या पदयात्रेचा विश्वकीर्तीमान झाला असून ग्रिनीज बुक आॅफ रेकॉर्ड आणि लिम्बा बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड सलग सात वेळा या पदयात्रेला मिळाला आहे. आता ही पदयात्रा शेवटच्या टप्प्यात असून तीन लाख पाच हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आता ४५ हजार किलोमीटरचे उद्दीष्ट बाकी आहे. या प्रवासादरम्यान तब्बल दहा देशातून भ्रमंती केल्याचे अवध बिहारीलाल यांनी पत्रपरिषदेतून सांगितले. अवध बिहारीलाल आज हे ४९ वर्षाचे आहे. त्यांनी २३ व्या वर्षी पदयात्रेला सुरुवात केली. इंदिरा गांधी यांनी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या भारत व नेपाळच्या सीमेवरील गावातून पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविली होती. तेव्हापासून ही पदयात्रा अविरतपणे सुरू आहे, आता तब्बल २० जणांची टीम तुकड्या तुकड्याने मार्गक्रमण करीत आहे. यात्रेतील प्रवासदरम्यान अशोककुमार या ३६ वर्षीय युवकाचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला. तर दोघांची दृष्टी गेली. त्यानंतरही ही यात्रा सुरूच राहणार आहे. आतापर्यंत बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, ब्रम्हदेश, चीन, थायलंड, अफगानिस्तान या देशातून पर्यावरण, शिक्षा, जलसंरक्षण, लोकसंख्या नियंत्रण, कन्याभ्रूण हत्या, विश्वशांती, महिला सक्षमीकरण असे संदेश देत ही यात्रा सुरू आहे. भारतातील गावखेड्यातून जाताना केंद्र सरकारच्या ११०० योजनांची माहिती दिली जाते. आतापर्यंत तीन कोटी २० लाख वृक्षांचे रोपण केले आहे. यात्रेत अनेक कडू-गोड अनुभव आल्याचेही सांगितले. वयाच्या ११ व्या वर्षी महेंद्र प्रताप यांनी यात्रेला सुरुवात केली तर जितेंद्र प्रताप यांनी वयाच्या १३ व्या वर्षी यात्रेत सहभाग घेतला. यात्रेतील प्रत्येक सहभागी व्यक्तीने कुटुंबात परत न जाण्याचा संकल्प केला आहे. यातील प्रत्येक जण अविवाहित राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी देहदानाचाही संकल्प घेतला आहे. आता ही यात्रा यवतमाळवरून अमरावती, औरंगाबाद आणि मुंबईला जाणार आहे. पुढील पाच वर्षात ४५ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे. एका दिवशी ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. सोबत कुठेही साहित्य नसते. आहारावर नियंत्रण, तुळस, कडूनिंब आणि बेलांच्या पानांचे सेवन हीच त्यांची औषधी आहे. सकाळी ५ वाजता योगा करून यात्रेला प्रारंभ होतो. सायंकाळी मुक्काम असा दिनक्रम असल्याचे अवध बिहारीलाल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)