शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२६ प्रकल्पांचे पाणी नदीपात्रात सोडणार

By admin | Updated: April 25, 2016 02:08 IST

जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने केलेले सर्व उपायही तोकडे ठरत आहे.

६६ दलघमी पाणी आरक्षित : पाणीटंचाई निवारणासाठी धरणांचा आधार यवतमाळ : जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने केलेले सर्व उपायही तोकडे ठरत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विविध प्रकल्पात असलेले आरक्षित पाणी नदी पात्रात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पाचे पाणी चार टप्प्यात नदी पात्रात सोडून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे नदी तीरावरील नागरिकांचा आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अपुऱ्या पावसाने भूजल पातळी खालावली आहे. पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २६ प्रकल्पातील ६६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले. आरक्षित पाणी नागरिकांच्या मागणीनुसार आणि दुष्काळी परिस्थिती पाहून पाटबंधारे विभागाच्या मदतीने सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे गत काही महिन्यांपासून विविध ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे धरणाचे पाणी सोडण्यासाठी विनंती केली आहे. उपलब्धतेनुसार आतापर्यंत २८ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. परंतु आता टंचाईची भीषणता वाढल्याने जिल्ह्याच्या २६ प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. यात पूस (ता. पुसद), गोखी (ता. दारव्हा), वाघाडी (यवतमाळ), सायखेडा (पांढरकवडा), अर्जुना (यवतमाळ), लोअरपूस (ता. महागाव), उर्ध्वपैनगंगा (ता. पुसद), नवरगाव (ता. वणी), अरुणावती (ता. दिग्रस), नेर, कुंभारकिन्ही (ता. दारव्हा), अडाण (ता. दारव्हा), वरुड, पिंपळखुटी (ता. पांढरकवडा), दत्तापूर, घोटी (ता. घाटंजी), राजूर, अंतरगाव, जामवाडी (दारव्हा), मुंजाळा, वाईचंडिका, पिरंजी, करंजी या प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या या प्रकल्पांमधील ६६ दलघमी पाणी आरक्षित आहे. उपलब्धतेनुसार सदर पाणी नदी पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर काही अंशी मात करण्यात यश येणार आहे. (शहर वार्ताहर)जिल्हा परिषदेने स्वीकारली पाणी कराची जबाबदारीआरक्षित जलसाठ्यातून पाणी नदी पात्रात सोडल्यास त्याचा कर पाटबंधारे विभागाकडे भरावा लागतो. हा कर भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असते. परंतु काही ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कर भरण्यास त्या असमर्थ आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारली आहे.