शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

२६ प्रकल्पांचे पाणी नदीपात्रात सोडणार

By admin | Updated: April 25, 2016 02:08 IST

जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने केलेले सर्व उपायही तोकडे ठरत आहे.

६६ दलघमी पाणी आरक्षित : पाणीटंचाई निवारणासाठी धरणांचा आधार यवतमाळ : जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने केलेले सर्व उपायही तोकडे ठरत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विविध प्रकल्पात असलेले आरक्षित पाणी नदी पात्रात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पाचे पाणी चार टप्प्यात नदी पात्रात सोडून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे नदी तीरावरील नागरिकांचा आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अपुऱ्या पावसाने भूजल पातळी खालावली आहे. पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २६ प्रकल्पातील ६६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले. आरक्षित पाणी नागरिकांच्या मागणीनुसार आणि दुष्काळी परिस्थिती पाहून पाटबंधारे विभागाच्या मदतीने सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे गत काही महिन्यांपासून विविध ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे धरणाचे पाणी सोडण्यासाठी विनंती केली आहे. उपलब्धतेनुसार आतापर्यंत २८ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. परंतु आता टंचाईची भीषणता वाढल्याने जिल्ह्याच्या २६ प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. यात पूस (ता. पुसद), गोखी (ता. दारव्हा), वाघाडी (यवतमाळ), सायखेडा (पांढरकवडा), अर्जुना (यवतमाळ), लोअरपूस (ता. महागाव), उर्ध्वपैनगंगा (ता. पुसद), नवरगाव (ता. वणी), अरुणावती (ता. दिग्रस), नेर, कुंभारकिन्ही (ता. दारव्हा), अडाण (ता. दारव्हा), वरुड, पिंपळखुटी (ता. पांढरकवडा), दत्तापूर, घोटी (ता. घाटंजी), राजूर, अंतरगाव, जामवाडी (दारव्हा), मुंजाळा, वाईचंडिका, पिरंजी, करंजी या प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या या प्रकल्पांमधील ६६ दलघमी पाणी आरक्षित आहे. उपलब्धतेनुसार सदर पाणी नदी पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर काही अंशी मात करण्यात यश येणार आहे. (शहर वार्ताहर)जिल्हा परिषदेने स्वीकारली पाणी कराची जबाबदारीआरक्षित जलसाठ्यातून पाणी नदी पात्रात सोडल्यास त्याचा कर पाटबंधारे विभागाकडे भरावा लागतो. हा कर भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असते. परंतु काही ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कर भरण्यास त्या असमर्थ आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारली आहे.