शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२६ अर्धवट नळयोजना गुंडाळल्या

By admin | Updated: January 6, 2015 23:07 IST

राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून

राष्ट्रीय पेयजल योजना : १२ ठिकाणी अपहार, समिती सदस्यांवर कारवाई होणार यवतमाळ : राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून रखडल्या होत्या. तर १२ ठिकाणी अपहार झाल्याचे पुढे आल्याने ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.गावा गावात वर्षोनगणती असलेली पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना अस्तित्वात आणली. प्रथमच नळयोजनेचे काम करण्याचा अधिकारी गावातील पाणी पुरवठा आणि दक्षता समितीला देण्यात आला. ग्रामस्थांनाच योजनेचे काम करण्याचा अधिकार देण्यामागे वेळेत काम पूर्ण करून भष्ट्राचाराला पायाबंद घालणे हा होता. प्रत्यक्षात मात्र योनजेच्या मुळ उद्देशालाचा हरताळ फासण्यात आला. अनेक गावात योनजच्या पैशाची उचल करून परस्पर खर्च केले. नळयोनजेचे कामच करण्यता आले नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडून सातत्याने चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला. मात्र यातूनही काहीच साध्य होत नसल्याने २००६ पासून विविध कारणाने रखडलेल्या नळ योजनेचे काम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय चौकशीमध्ये १२ गावातील नळ योजनेच्याकामात अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. भष्ट्राचाराची कीड लागल्याणे आता ही गावे कायमस्वरूपी तहानलेली राहणार आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र सध्यातरी निरूत्तरीत आहे. गावकरी शुद्ध आणि मुबलक पाण्याला कायमचे मुकणार हे मात्र निश्चत. (कार्यालय प्रतिनिधी)