शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५६ डीपी बंद

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

केवळ ६२ चे काम सुरू : अधीक्षक अभियंत्यांची धक्कादायक माहितीयवतमाळ : वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली. सिंचनाचा मुद्दा सदस्यांनी या बैठकीत उपस्थित करत सलग आठ तास कृषिपंपांना वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले. खरिपाचा हंगाम पुरता बुडाल्याने शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून रबीतील पीक घेण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृतरित्याच एका कनेक्शनवर दोन ते तीन मोटरपंप बसविल्याचे वास्तवही आहे. अशाच काही कारणांमुळे जिल्ह्यातील कृषिपंपांना वीज पुरवठा करणारे २५६ रोहित्र बंद आहे. त्यापैकी केवळ ६२ रोहित्रांचे पैसे भरल्यामुळे बसवायची कार्यवाही सुरू असल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वीज कंपनीने ४८ तासाच्या आत हे रोहित्र बसविणे बंधनकारक असल्याचीही पुष्टी जाधव यांनी या बैठकीत केली. ही धक्कादायक माहिती ऐकून स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षासह उपस्थित सदस्यांना हादराच बसला. मात्र नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या वीज कंपनीने एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याऐवजी शासनाने जळालेल्या विद्युत रोहित्रासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. वीज कंपनीकडून दिवसाला आठ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र हा वीज पुरवठा दोन टप्प्यात देण्यात येतो. त्यामुळे सिंचन करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतमजूर मिळत नाही. वीज कंपनीने सलग आठ तास वीज पुरवठा दिल्यास मजुराकडून काम करून घेणे शक्य होईल ही अडचणही या बैठकीत अमन गावंडे यांनी मांडली. या बैठकीत अमन गावंडे यांनी बाभूळगाव तालुक्यातील १३२ केव्हीच्या प्रस्तावित वीज उपकेंद्राचाही मुद्दा मांडला. बाभूळगाव येथील फिडरवर येणाऱ्या वाहन्या जंगलातून जातात. त्यामुळे लाईन ट्रिप झाल्यास तातडीने दुरुस्ती शक्य होत नाही. त्यासाठी ३३ केव्हीचे उपकेंद्र सरूळ येथे वाढविण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर धामणगाव येथून वीज जोडणी देण्याऐवजी अतिरिक्त भार वाढविण्यात आला. या चुकीच्या कामामुळे कंत्राटदार कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण होत आहे. ही अडचण बैठकीत मांडताच वीज अभियंत्यांनीही सदर कंपनीवर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले. शिवाय बैठकीत नायगाव येथील नळजोडणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)