शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जिल्ह्यातील २५६ डीपी बंद

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

केवळ ६२ चे काम सुरू : अधीक्षक अभियंत्यांची धक्कादायक माहितीयवतमाळ : वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली. सिंचनाचा मुद्दा सदस्यांनी या बैठकीत उपस्थित करत सलग आठ तास कृषिपंपांना वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले. खरिपाचा हंगाम पुरता बुडाल्याने शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून रबीतील पीक घेण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृतरित्याच एका कनेक्शनवर दोन ते तीन मोटरपंप बसविल्याचे वास्तवही आहे. अशाच काही कारणांमुळे जिल्ह्यातील कृषिपंपांना वीज पुरवठा करणारे २५६ रोहित्र बंद आहे. त्यापैकी केवळ ६२ रोहित्रांचे पैसे भरल्यामुळे बसवायची कार्यवाही सुरू असल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वीज कंपनीने ४८ तासाच्या आत हे रोहित्र बसविणे बंधनकारक असल्याचीही पुष्टी जाधव यांनी या बैठकीत केली. ही धक्कादायक माहिती ऐकून स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षासह उपस्थित सदस्यांना हादराच बसला. मात्र नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या वीज कंपनीने एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याऐवजी शासनाने जळालेल्या विद्युत रोहित्रासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. वीज कंपनीकडून दिवसाला आठ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र हा वीज पुरवठा दोन टप्प्यात देण्यात येतो. त्यामुळे सिंचन करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतमजूर मिळत नाही. वीज कंपनीने सलग आठ तास वीज पुरवठा दिल्यास मजुराकडून काम करून घेणे शक्य होईल ही अडचणही या बैठकीत अमन गावंडे यांनी मांडली. या बैठकीत अमन गावंडे यांनी बाभूळगाव तालुक्यातील १३२ केव्हीच्या प्रस्तावित वीज उपकेंद्राचाही मुद्दा मांडला. बाभूळगाव येथील फिडरवर येणाऱ्या वाहन्या जंगलातून जातात. त्यामुळे लाईन ट्रिप झाल्यास तातडीने दुरुस्ती शक्य होत नाही. त्यासाठी ३३ केव्हीचे उपकेंद्र सरूळ येथे वाढविण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर धामणगाव येथून वीज जोडणी देण्याऐवजी अतिरिक्त भार वाढविण्यात आला. या चुकीच्या कामामुळे कंत्राटदार कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण होत आहे. ही अडचण बैठकीत मांडताच वीज अभियंत्यांनीही सदर कंपनीवर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले. शिवाय बैठकीत नायगाव येथील नळजोडणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)