शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

जिल्ह्यातील २५६ डीपी बंद

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

केवळ ६२ चे काम सुरू : अधीक्षक अभियंत्यांची धक्कादायक माहितीयवतमाळ : वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली. सिंचनाचा मुद्दा सदस्यांनी या बैठकीत उपस्थित करत सलग आठ तास कृषिपंपांना वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले. खरिपाचा हंगाम पुरता बुडाल्याने शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून रबीतील पीक घेण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृतरित्याच एका कनेक्शनवर दोन ते तीन मोटरपंप बसविल्याचे वास्तवही आहे. अशाच काही कारणांमुळे जिल्ह्यातील कृषिपंपांना वीज पुरवठा करणारे २५६ रोहित्र बंद आहे. त्यापैकी केवळ ६२ रोहित्रांचे पैसे भरल्यामुळे बसवायची कार्यवाही सुरू असल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वीज कंपनीने ४८ तासाच्या आत हे रोहित्र बसविणे बंधनकारक असल्याचीही पुष्टी जाधव यांनी या बैठकीत केली. ही धक्कादायक माहिती ऐकून स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षासह उपस्थित सदस्यांना हादराच बसला. मात्र नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या वीज कंपनीने एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याऐवजी शासनाने जळालेल्या विद्युत रोहित्रासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. वीज कंपनीकडून दिवसाला आठ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र हा वीज पुरवठा दोन टप्प्यात देण्यात येतो. त्यामुळे सिंचन करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतमजूर मिळत नाही. वीज कंपनीने सलग आठ तास वीज पुरवठा दिल्यास मजुराकडून काम करून घेणे शक्य होईल ही अडचणही या बैठकीत अमन गावंडे यांनी मांडली. या बैठकीत अमन गावंडे यांनी बाभूळगाव तालुक्यातील १३२ केव्हीच्या प्रस्तावित वीज उपकेंद्राचाही मुद्दा मांडला. बाभूळगाव येथील फिडरवर येणाऱ्या वाहन्या जंगलातून जातात. त्यामुळे लाईन ट्रिप झाल्यास तातडीने दुरुस्ती शक्य होत नाही. त्यासाठी ३३ केव्हीचे उपकेंद्र सरूळ येथे वाढविण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर धामणगाव येथून वीज जोडणी देण्याऐवजी अतिरिक्त भार वाढविण्यात आला. या चुकीच्या कामामुळे कंत्राटदार कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण होत आहे. ही अडचण बैठकीत मांडताच वीज अभियंत्यांनीही सदर कंपनीवर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले. शिवाय बैठकीत नायगाव येथील नळजोडणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)