शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

सदोष वजनमापांची २४२ प्रकरणे उघड

By admin | Updated: July 9, 2015 02:28 IST

बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे.

सात हजार प्रकरणे : ४१ लाखांचा महसूल यवतमाळ : बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे. याचे कारणही तसेच आहे. वस्तू डोळ्यादेखत मोजली तरी त्यातील वजन मात्र धोका देणारे असते. असे प्रकार दररोज घडतात. मात्र क्षुल्लक बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण वजनमापे विभागाने केलेल्या तपासणीत अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. सात हजार १७७ व्यावसायिकांच्या मजनमापांची तपासणी करण्यात आली. त्यात २४२ व्यावसायिकांच्या वजनमापामध्ये दोष आढळून आला. अशा व्यावसायिकांवर खटला भरण्यात आला आहे.जिल्ह्यात ठोक परवानाधारक विक्रेत्यांची संख्या १० हजारांच्या वर आहे. किरकोळ भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांची संख्या फार मोठी आहे. वैधमापन शास्त्र विभाग विक्रेत्यांचे वजन मोजत नाही. त्यासाठी मोहीम राबवित नाही. परिणामी व्यावसायिकांनी याचा चांगलाच फायदा घेतला आहे. भाजी आणि फळ खरेदीसोबत बाजारातून धान्य खरेदी केल्यानंतर घरी मोजले तर त्यात तूट आढळते. यामध्ये विक्रेते वजनाचे सील काढतात. वजन खालून घासले जाते. अथवा तराजूमध्ये तशी सोय करून घेतली जाते. यातून ग्राहकांची लूट होते. खुद्द वैधमापनशास्त्र विभागाने मापे प्रमाणित करून घेतले. यातून ४१ लाख ३३ हजार १४७ रुपयंचा महसूल मिळविला. कुठल्याही पदार्थाची विक्र ी वेस्टन बंद डब्यात विकणे गरजेचे आहे. यावर कायदेशीर माहिती असणे अपेक्षित आहे. असे असताना वर्षभरात २४२ प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले. या प्रकरणात व्यावसायिकांवर खटले भरण्यात आले. यातील सहा प्रकरणात चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सदोष वजनमापे वापरणाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (शहर वार्ताहर)