शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कामगार कल्याणची २२ केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:45 IST

कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद नसल्याचे कारणखासगी क्षेत्रातील कामगारांना धक्का

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे. शिवाय माहितीअभावी योजनांपासून वंचित राहण्याचीही भीती व्यक्त होत आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेतील (दुकान/संस्था) कामगारांची नोंदणी कामगार कल्याण केंद्रात केली जाते. कामगाराचे १२ रुपये, आस्थापनेचे ३६ आणि शासनाचे २४ रुपये, असा यासाठी आर्थिक वाटा असतो. नोंदणी झालेल्या आणि रक्कम कपात होत असलेल्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना विविध लाभ दिले जातात. विशेष म्हणजे आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.राज्यात कार्यरत असलेल्या २३० केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक कामगारांची नोंद करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या कामगारांना योजनांचा लाभही दिला जात आहे. मात्र प्रतिसाद नसल्याचे सांगत राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील ही केंदे्र आहेत. प्रतिसाद अर्थात सभासद नोंदणी मानली जाते. बंद होत असलेल्या केंद्रांची नोंदणी केवळ ८०० ते १२०० च्या घरात आहे. नोंदणी वाढविण्याची जबाबदारी केंद्र संचालकाची आहे. यात ते कमी पडल्याचे स्पष्ट होते.यात नुकसान मात्र नोंदणी झालेल्या कामगारांचे होणार आहे. सभासद नोंदणीचे उद्दिष्ट तर दूर त्या जवळपासही पोहोचले नसलेली ही २२ केंदे्र असल्याचे सांगितले जाते. केंद्र कार्यालयाचा पाच वर्षांचा आढावा घेऊन सदर केंद्रांना कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ एप्रिलपासून ही केंदे्र बंद होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या ठिकाणची केंदे्र बंद केली जात आहेत.रिक्त पदांमुळे कार्य प्रभावितचांगला प्रतिसाद असलेल्या केंद्रांचे कार्य रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहेत. केंद्र कार्यालयाच्या ठिकाणी केंद्र संचालक, केंद्र प्रमुखांची वानवा आहे. बंद होणाऱ्या केंद्रातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर पाठविले जाणार आहे.असे मिळतात कामगारांना लाभकामगार केंद्रात नोंदणी झाली असलेले कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ मोठा दिलासा देणारे आहेत. शिष्यवृत्ती, एमएससीआयटी याकरिता आर्थिक लाभ दिले जातात. पुरस्काराने सन्मानित केले जाते. राज्यस्तर कबड्डी व कुस्ती स्पर्धेत सहभागाची संधी मिळते. विशेष म्हणजे असाध्य रोगासाठी हातभार लावला जातो.

टॅग्स :Governmentसरकार