शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यातील पाण्याचे २१ टक्के नमुने दूषित

By admin | Updated: October 29, 2016 00:19 IST

जिल्ह्यातील ५६५ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी २१ टक्के आहे.

ब्लिचिंगमध्येही घोळ : आरोग्य विभागाने केले मान्ययवतमाळ : जिल्ह्यातील ५६५ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी २१ टक्के आहे. आरोग्य विभागाने ही कबुली दिल्याने पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याचे नमुने संकलित केले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यावरून ते पाणी दूषित आहे की पिण्यास योग्य आहे, हे ठरविले जाते. दूषित पाणी आरोग्यास घातक असते. आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात अणुजीव तपासणीकरिता जिल्हाभरातून दोन हजार ५७८ पाणी नमुने गोळा केले होते. प्रयोगशाळेत तपासणीअंती त्यापैकी तब्बल ५६५ नमुने दूषित असल्याचे आढळूनआले. त्यामुळे संबंधित गावांतील ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. याच महिन्यात ब्लिचिंग पावडरचेही ४३० नमुने घेण्यात आले. सर्व ग्रामपंचायतींना पाण्यात टाकण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ब्लिचिंगचा पुरवठा केला जातो. मात्र अनेक गावांत पाण्यात ब्लिचिंगच टाकले जात नसल्याच्या तक्रारी होतात. हे ब्लिचिंग नेमके कुठे जाते, असा प्रश्न निर्माण होतो. आता पुरविलेल्या या ब्लिचिंगपैकीही तब्बल १० टक्के नमुन्यात क्लोरीन कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. (शहर प्रतिनिधी)क्लोरीनची मात्रा कमी असूनही गप्प दरमहा घेण्यात येणाऱ्या पाणी नमुने आणि ब्लिचिंग नमुन्यात नेहमी गोंधळ उघड होतो. आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य समितीच्या बैठकीत माहिती सादर केली जाते. मात्र त्यावर कारवाईच्या नावाने मूग गिळण्यात येते. ब्लिचिंगमध्ये क्लोरीनचे प्रमाण कमी आढळूनही संबंधितांना साधा जाब विचारला जात नाही. कारवाई तर अत्यंत दूरची बाब झाली. हीच गत हिवताप नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातही दिसून येते. केवळ आढावा सादर करून त्याला मंजुरी घेतली जाते.