शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

जिल्ह्यातील पाण्याचे २१ टक्के नमुने दूषित

By admin | Updated: October 29, 2016 00:19 IST

जिल्ह्यातील ५६५ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी २१ टक्के आहे.

ब्लिचिंगमध्येही घोळ : आरोग्य विभागाने केले मान्ययवतमाळ : जिल्ह्यातील ५६५ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी २१ टक्के आहे. आरोग्य विभागाने ही कबुली दिल्याने पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याचे नमुने संकलित केले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यावरून ते पाणी दूषित आहे की पिण्यास योग्य आहे, हे ठरविले जाते. दूषित पाणी आरोग्यास घातक असते. आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात अणुजीव तपासणीकरिता जिल्हाभरातून दोन हजार ५७८ पाणी नमुने गोळा केले होते. प्रयोगशाळेत तपासणीअंती त्यापैकी तब्बल ५६५ नमुने दूषित असल्याचे आढळूनआले. त्यामुळे संबंधित गावांतील ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. याच महिन्यात ब्लिचिंग पावडरचेही ४३० नमुने घेण्यात आले. सर्व ग्रामपंचायतींना पाण्यात टाकण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ब्लिचिंगचा पुरवठा केला जातो. मात्र अनेक गावांत पाण्यात ब्लिचिंगच टाकले जात नसल्याच्या तक्रारी होतात. हे ब्लिचिंग नेमके कुठे जाते, असा प्रश्न निर्माण होतो. आता पुरविलेल्या या ब्लिचिंगपैकीही तब्बल १० टक्के नमुन्यात क्लोरीन कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. (शहर प्रतिनिधी)क्लोरीनची मात्रा कमी असूनही गप्प दरमहा घेण्यात येणाऱ्या पाणी नमुने आणि ब्लिचिंग नमुन्यात नेहमी गोंधळ उघड होतो. आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य समितीच्या बैठकीत माहिती सादर केली जाते. मात्र त्यावर कारवाईच्या नावाने मूग गिळण्यात येते. ब्लिचिंगमध्ये क्लोरीनचे प्रमाण कमी आढळूनही संबंधितांना साधा जाब विचारला जात नाही. कारवाई तर अत्यंत दूरची बाब झाली. हीच गत हिवताप नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातही दिसून येते. केवळ आढावा सादर करून त्याला मंजुरी घेतली जाते.