शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शिळे अन्न खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा

By विशाल सोनटक्के | Updated: May 22, 2024 18:34 IST

म्हसोबा तांडा येथील घटना : आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

यवतमाळ : आर्णी  तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर जेवणाचे आयोजन होते. त्या जेवणातील शिळे अन्न बुधवारी सकाळी खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा झाली असून, या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण ठेवण्यात आले होते. त्यातील बरेचसे जेवण शिल्लक राहिले. हे जेवण बुधवारी सकाळी काहींनी घेतले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने यातील काहींना जुलाब तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या भाविकांना तातडीने दुपारी दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, आर्णी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले.

यामध्ये प्रगती संतोष जाधव (२१), बजरंग प्रल्हाद जाधव (३५), किरण नीलेश जाधव (३८), उकंडा सूर्यभान राठोड (५०), पल्लवी बजरंग जाधव (३०), सुरेखा बाबुलाल राठोड (४५), बेबी उकंडा राठोड (४०), जगदीश बाबूलाल राठोड (३२), भारत हरिश्चंद जाधव (३२), दर्पण भारत जाधव (६), नीलेश दिलीप जाधव (३५), भारती दिनेश राठोड (३०), उदयसिंग सुदाम चव्हाण (४५), रेखा गणेश राठोड (४०), नम्रता गणेश राठोड (१२), विजू गणेश जाधव (७), निर्मला दिलीप जाधव (५०), भारत संतोष जाधव (२०), दिलीप रामसिंग जाधव (७५), पूजा प्रकाश राठोड (२७) आणि सीमा जगदीश राठोड (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी म्हसोबा तांडा येथे भेट देऊन आढावा घेतला.

 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाYavatmalयवतमाळ