शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

शिळे अन्न खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा

By विशाल सोनटक्के | Updated: May 22, 2024 18:34 IST

म्हसोबा तांडा येथील घटना : आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

यवतमाळ : आर्णी  तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर जेवणाचे आयोजन होते. त्या जेवणातील शिळे अन्न बुधवारी सकाळी खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा झाली असून, या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण ठेवण्यात आले होते. त्यातील बरेचसे जेवण शिल्लक राहिले. हे जेवण बुधवारी सकाळी काहींनी घेतले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने यातील काहींना जुलाब तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या भाविकांना तातडीने दुपारी दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, आर्णी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले.

यामध्ये प्रगती संतोष जाधव (२१), बजरंग प्रल्हाद जाधव (३५), किरण नीलेश जाधव (३८), उकंडा सूर्यभान राठोड (५०), पल्लवी बजरंग जाधव (३०), सुरेखा बाबुलाल राठोड (४५), बेबी उकंडा राठोड (४०), जगदीश बाबूलाल राठोड (३२), भारत हरिश्चंद जाधव (३२), दर्पण भारत जाधव (६), नीलेश दिलीप जाधव (३५), भारती दिनेश राठोड (३०), उदयसिंग सुदाम चव्हाण (४५), रेखा गणेश राठोड (४०), नम्रता गणेश राठोड (१२), विजू गणेश जाधव (७), निर्मला दिलीप जाधव (५०), भारत संतोष जाधव (२०), दिलीप रामसिंग जाधव (७५), पूजा प्रकाश राठोड (२७) आणि सीमा जगदीश राठोड (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी म्हसोबा तांडा येथे भेट देऊन आढावा घेतला.

 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाYavatmalयवतमाळ