शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ...

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने दुचाकी व इतर वाहने त्यात उसळून अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे, तर काही अपघात हे भरधाव वेगाने व नियमांचे उल्लंघन केल्याने झाल्याचे दिसून येत आहे. पांढरकवडा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहने धावतात. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहे. या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडतात. महिन्यातून किमान एक, दोन मोठे अपघात घडतात. त्यात नाहक वाहनधारक तथा लगतच्या ग्रामस्थांचा बळी जातो. मागील आठवड्यात केळापूर येथील इसमाचा अशाच अपघातात बळी गेला, तर बुधवारी रात्रीदरम्यान पुन्हा साखरा गावाजवळ अपघात होऊन एका अज्ञात इसमाचा बळी गेला आहे. अपघातांची आणि बळी जाणाऱ्यांची मालिका सतत सुरूच आहे. ती खंडित होण्याचे नाव घेत नाही. यातील कित्येक अपघात हे रस्त्यावर पडलेल्या मोठंमोठ्या खड्यामुळे व दयनीय रस्त्यामुळे तर काही अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने घडल्याचे समोर आले. महामार्गाची नियमित देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सतत अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी हॉटेल्स, धाबे, बार आहेत. ट्रकचालक व इतर वाहनचालक आपली वाहने महामार्गावरच उभी करून तासनतास तशीच उभी ठेवतात. त्याचा परिणाम रात्री अशा उभ्या वाहनांना धडक दिली जाते. अशा अपघातांचीही संख्या भरपूर वाढत आहे. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत या ८ महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय व राज्य मार्गावर झालेल्या अपघातांत तब्बल २१ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाची व समाजाची किती हानी झाली असेल, याची कल्पना कदाचित शासनकर्त्यांना नसावी. त्यामुळेच दरवर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावांना उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, त्याकडेही लोकप्रधिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातून गेलेला नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ हा सोनुर्लीफाटा ते पिंपळखुटी असा ४५ किलोमीटर गेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

कोट : रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात उसळून अपघात होण्याच्या जास्त घटना घडल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यानेही अपघात घडत आहेत. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - देवाजी कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पांढरकवडा