शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ...

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने दुचाकी व इतर वाहने त्यात उसळून अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे, तर काही अपघात हे भरधाव वेगाने व नियमांचे उल्लंघन केल्याने झाल्याचे दिसून येत आहे. पांढरकवडा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहने धावतात. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहे. या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडतात. महिन्यातून किमान एक, दोन मोठे अपघात घडतात. त्यात नाहक वाहनधारक तथा लगतच्या ग्रामस्थांचा बळी जातो. मागील आठवड्यात केळापूर येथील इसमाचा अशाच अपघातात बळी गेला, तर बुधवारी रात्रीदरम्यान पुन्हा साखरा गावाजवळ अपघात होऊन एका अज्ञात इसमाचा बळी गेला आहे. अपघातांची आणि बळी जाणाऱ्यांची मालिका सतत सुरूच आहे. ती खंडित होण्याचे नाव घेत नाही. यातील कित्येक अपघात हे रस्त्यावर पडलेल्या मोठंमोठ्या खड्यामुळे व दयनीय रस्त्यामुळे तर काही अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने घडल्याचे समोर आले. महामार्गाची नियमित देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सतत अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी हॉटेल्स, धाबे, बार आहेत. ट्रकचालक व इतर वाहनचालक आपली वाहने महामार्गावरच उभी करून तासनतास तशीच उभी ठेवतात. त्याचा परिणाम रात्री अशा उभ्या वाहनांना धडक दिली जाते. अशा अपघातांचीही संख्या भरपूर वाढत आहे. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत या ८ महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय व राज्य मार्गावर झालेल्या अपघातांत तब्बल २१ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाची व समाजाची किती हानी झाली असेल, याची कल्पना कदाचित शासनकर्त्यांना नसावी. त्यामुळेच दरवर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावांना उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, त्याकडेही लोकप्रधिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातून गेलेला नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ हा सोनुर्लीफाटा ते पिंपळखुटी असा ४५ किलोमीटर गेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

कोट : रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात उसळून अपघात होण्याच्या जास्त घटना घडल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यानेही अपघात घडत आहेत. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - देवाजी कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पांढरकवडा