शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ...

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने दुचाकी व इतर वाहने त्यात उसळून अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे, तर काही अपघात हे भरधाव वेगाने व नियमांचे उल्लंघन केल्याने झाल्याचे दिसून येत आहे. पांढरकवडा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहने धावतात. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहे. या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडतात. महिन्यातून किमान एक, दोन मोठे अपघात घडतात. त्यात नाहक वाहनधारक तथा लगतच्या ग्रामस्थांचा बळी जातो. मागील आठवड्यात केळापूर येथील इसमाचा अशाच अपघातात बळी गेला, तर बुधवारी रात्रीदरम्यान पुन्हा साखरा गावाजवळ अपघात होऊन एका अज्ञात इसमाचा बळी गेला आहे. अपघातांची आणि बळी जाणाऱ्यांची मालिका सतत सुरूच आहे. ती खंडित होण्याचे नाव घेत नाही. यातील कित्येक अपघात हे रस्त्यावर पडलेल्या मोठंमोठ्या खड्यामुळे व दयनीय रस्त्यामुळे तर काही अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने घडल्याचे समोर आले. महामार्गाची नियमित देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सतत अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी हॉटेल्स, धाबे, बार आहेत. ट्रकचालक व इतर वाहनचालक आपली वाहने महामार्गावरच उभी करून तासनतास तशीच उभी ठेवतात. त्याचा परिणाम रात्री अशा उभ्या वाहनांना धडक दिली जाते. अशा अपघातांचीही संख्या भरपूर वाढत आहे. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत या ८ महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय व राज्य मार्गावर झालेल्या अपघातांत तब्बल २१ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाची व समाजाची किती हानी झाली असेल, याची कल्पना कदाचित शासनकर्त्यांना नसावी. त्यामुळेच दरवर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावांना उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, त्याकडेही लोकप्रधिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातून गेलेला नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ हा सोनुर्लीफाटा ते पिंपळखुटी असा ४५ किलोमीटर गेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

कोट : रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात उसळून अपघात होण्याच्या जास्त घटना घडल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यानेही अपघात घडत आहेत. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - देवाजी कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पांढरकवडा