शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

२००० नवीन बसेससाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहामंडळ संचालकांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर६०० कोटी हवे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दोन हजार नवीन लालपरी आणण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात आले आहे. यासाठी ६०० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एसटी महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.गतवर्षी शासनाने ७०० साध्या बसेस (५०० लालपरी, २०० विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने १८६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. यातील ११० कोटी रुपये शासनाने महामंडळाला दिले आहेत. या ७०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.एसटीच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने दोन हजार साध्या बसेस खरेदी करण्यासाठी ६०० कोटींची तरतूद करावी, असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती ना.अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली असल्याचे महामंडळाच्या जनसंपर्क विभागातर्फे कळविण्यात आले आहे.गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे ६० किलोमीटरच्या परिघामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासी वर्गाला एसटीची लालपरीच अविरत सेवा देत आहे. या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्याच्या दृष्टीने नवीन बसेस खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक