शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जिल्ह्याला हव्या २०० कोटींच्या नोटा

By admin | Updated: November 11, 2016 02:11 IST

५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला.

बँकांवर वाढला ताण : नोटा बदलून घेण्याची नागरिकांना घाई, ग्रामीण भागात व्यवहार ठप्पयवतमाळ : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. बुधवारी बँका बंद राहील्या. गुरूवारी बँका उघडताच खातेधारकांनी प्रचंड गर्दी केली. सर्वच ठिकाणी बँका उघडण्यापूर्वीच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. शहराच्या तुलनेत ग्रामीण क्षेत्रात मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी दिवसभर कायम होती. युवक, युवतींपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी बँकेकडे धाव घेतली. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियासह खासगी बँकांनी रिझर्व बँकेकडे चलन बदलासाठी २०० कोटींची मागणी केली. हा पैसा गुरूवारी येण्याची अपेक्षा होती. मात्र गुरूवारी हा पैसा पोहोचला नाही. यामुळे बँकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले १०० आणि ५० चे चलन काढावे लागले. दुपारनंतर हेही चलन संपले. १० रूपयांच्या नोटांचे चलन वितरित करण्यात आले. शुक्रवारी नवीन चलनातील २०० कोटींच्या नोटा पोहोचण्याचा अंदाज वर्र्तविला जात आहे. (शहर वार्ताहर)खासगी बँकांतील नोटा सायंकाळी संपल्याकॉसमॉस बँक आणि इंडियन ओवर्सिस बँकेमधील चिल्लर नोटा सायंकाळी संपल्या. यामुळे बँकांनी सायंकाळी केवळ पैसे जमा केले. चलन मिळताच नवीन पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. यामुळे अनेक ग्राहकांना पैसे भरल्यानंतरही चिल्लर नोटा मिळाल्या नाही. सावला नावाच्या ग्राहकाने ‘लोकमत’कडे याबाबत कैफियत मांडली. कॉसमॉस बँंकेच्या व्यवस्थापकांनी चलन संपल्यामळे वितरण बंद केल्याचे मान्य केले. तर सिंडीकेट बँक व्यवस्थापनाने स्टेट बँकेकडे पैशाचे मागणी केली. ४.३० पर्यंत कॅश मिळाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उमरसरा स्टेट बँकेने आपले कामकाज लवकरच आटोपते घेतले. त्यामुळे काही ग्राहकांनी ‘लोकमत’ कार्यालयाकडे संपर्क साधला. वीज कंपनी स्वीकारणार ५०० च्या नोटावीज वितरण कंपनीने वीज बिल भरताना ५०० च्या नोटा स्वीकारण्यास प्रथम नकार दिला होता. मात्र आता ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येईल. तसेच वीज बिलाची मुदत वाढवून देण्यात येईल.२०० कोटींच्या चिल्लर नोटा द्या३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मंगळवारी रात्री या निर्णयाची घोषणा झाली. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. बुधवारी बँका बंद होत्या. गुरूवारपासून बँकांचे नियमित कामकाज सुरू झाले. व्यवहारात असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलून त्या चलनात आनण्यासाठी गुरूवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. चलन बदलविणे, पैसे डिपॉझिट करणे, खात्यातून पैसे काढणे या कामांसाठी चिल्लर नोटांची मागणी झाली. एकाच वेळी उसळलेल्या गर्दीने बँकांपुढे पहाटेपासूनच रांगा लागल्या. जिल्ह्यातील चिल्लर नोटांची मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री तातडीची बैठक घेतली. कामकाजाच्या सूचना दिल्या. २०० कोटी रूपयांच्या चिल्लर नोटांची मागणी रिझर्व बँकेकडे नोंदविण्यात आली. या नोटा मिळविण्यासाठी बँकांचे कर्मचारी रवाना झाले. मात्र गुरूवारी उशिरापर्यंत नोटा मिळाल्या नाही. शुक्रवारी बँकांमध्ये चिल्लर नोटा पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.