शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

२० गावे तहानलेलीच

By admin | Updated: May 19, 2014 23:56 IST

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे.

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

अखिलेश अग्रवाल - पुसद

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे. पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत असून सायकल, बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शेकडो नागरिकांंना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भाग गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सहन करीत आहे. वाड्या-तांड्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार असतो. बेलोरा जिल्हा परिषद सर्कलमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून २० गावांना पाणीच मिळत नाही. मारवाडी खुर्द, मारवाडी बु., वसंतवाडी, रोहडा, मांजरजवळा, बेलोरा, कुंभारी, हनुमाननगर, पांढुर्णा, छोटा बेलोरा, कान्हेरवाडी, वाघजाळी, आसोला, पन्हाळा, म्हैसमाळ, हनवतखेडा, नांदुरा, सत्तरमाळ, पिंपळगाव या गावातील ३३ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटे ५ वाजतापासून पाण्यासाठी दोन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही शोकांतिका आहे. फेट्रा येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतून प्रत्येक गावांना पाईपलाईन टाकण्यात आली आहे. वसंतवाडी ते पिंपळगाव या रस्त्यावरील पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. तसेच मारवाडी ते रोहडा या रस्त्यावर चार ठिकाणी पाणी धो-धो वाहते. रोहडा ते बेलोरा या रस्त्यावर असलेल्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. लिकेजमुळे पाणी माती मिश्रीत होत असल्याने ते पिण्यायोग्यही राहत नाही. त्यामुळे नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. मारवाडी, वसंतवाडी, हनुमाननगर व इतर तांड्यातील नागरिक मारवाडी बु. येथील रस्त्यालगत असलेल्या संतोष मुराई यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणतात. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंंता वाशिम येथून जाणे येणे करतात. त्यामुळे त्यांचे याकडे लक्ष नाही. उन्हाच्या दाहकतेसोबत पाणीटंचाईचा प्रश्नही उग्ररुप घेत आहे. गळतीची कामे मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता या कामाला सुरुवात करणार असल्याचे समजते. गावकर्‍यांना पाणी केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराच्या संगनमतानेच २० गावातील नागरिकांना १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही, असा आरोप आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून या महिन्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात मारवाडी खुर्द, पन्हाळा, म्हैसमाळ या गावांचा समावेश आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आराखड्यात मंजूर आहे. आता मे महिना संपला तरी अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे १५ दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी पायपीट करीत आहे. भारनियमनाचे चटके पाणीटंचाई उग्र होण्यात भारनियमनाचाही मोठा हातभार आहे. वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावागावातील पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब लागतो. परिणामी पाणीटंचाई तीव्र रुप घेत आहे. सोमवार ते गुरुवार पहाटे ५ ते सकाळी ९.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत भारनियमन असते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प असते.