शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

२० गावे तहानलेलीच

By admin | Updated: May 19, 2014 23:56 IST

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे.

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

अखिलेश अग्रवाल - पुसद

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे. पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत असून सायकल, बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शेकडो नागरिकांंना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भाग गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सहन करीत आहे. वाड्या-तांड्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार असतो. बेलोरा जिल्हा परिषद सर्कलमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून २० गावांना पाणीच मिळत नाही. मारवाडी खुर्द, मारवाडी बु., वसंतवाडी, रोहडा, मांजरजवळा, बेलोरा, कुंभारी, हनुमाननगर, पांढुर्णा, छोटा बेलोरा, कान्हेरवाडी, वाघजाळी, आसोला, पन्हाळा, म्हैसमाळ, हनवतखेडा, नांदुरा, सत्तरमाळ, पिंपळगाव या गावातील ३३ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटे ५ वाजतापासून पाण्यासाठी दोन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही शोकांतिका आहे. फेट्रा येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतून प्रत्येक गावांना पाईपलाईन टाकण्यात आली आहे. वसंतवाडी ते पिंपळगाव या रस्त्यावरील पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. तसेच मारवाडी ते रोहडा या रस्त्यावर चार ठिकाणी पाणी धो-धो वाहते. रोहडा ते बेलोरा या रस्त्यावर असलेल्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. लिकेजमुळे पाणी माती मिश्रीत होत असल्याने ते पिण्यायोग्यही राहत नाही. त्यामुळे नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. मारवाडी, वसंतवाडी, हनुमाननगर व इतर तांड्यातील नागरिक मारवाडी बु. येथील रस्त्यालगत असलेल्या संतोष मुराई यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणतात. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंंता वाशिम येथून जाणे येणे करतात. त्यामुळे त्यांचे याकडे लक्ष नाही. उन्हाच्या दाहकतेसोबत पाणीटंचाईचा प्रश्नही उग्ररुप घेत आहे. गळतीची कामे मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता या कामाला सुरुवात करणार असल्याचे समजते. गावकर्‍यांना पाणी केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराच्या संगनमतानेच २० गावातील नागरिकांना १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही, असा आरोप आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून या महिन्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात मारवाडी खुर्द, पन्हाळा, म्हैसमाळ या गावांचा समावेश आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आराखड्यात मंजूर आहे. आता मे महिना संपला तरी अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे १५ दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी पायपीट करीत आहे. भारनियमनाचे चटके पाणीटंचाई उग्र होण्यात भारनियमनाचाही मोठा हातभार आहे. वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावागावातील पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब लागतो. परिणामी पाणीटंचाई तीव्र रुप घेत आहे. सोमवार ते गुरुवार पहाटे ५ ते सकाळी ९.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत भारनियमन असते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प असते.