शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

२० पाणीदार गावे होणार हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:25 IST

वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : लोकसहभागातून ७५ हजार रोपटी

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्याची निवड झाल्यानंतर ५० गावे त्यात सहभागी झाली. यापैकी २० गावांनी रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काशीद, करंज, कडूनिंब, पिंपळ, वड, शेवगा, सीताफळ आदी प्रकारच्या फुले, फळे तसेच सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या बियांची निवड केली. श्रमदानातून गोळा केलेला तळ्यातील गाळ, दर्जेदार माती, वाळू, शेणखत आदी मिश्रण करून त्यात रोपे लावण्यात आली. या रोपट्यांना सावली मिळावी म्हणून शेडनेटची व्यवस्था केली.गेल्या दोन महिन्यात लोही, बोरी, लाखखिंड, हातोला, खोपडी, पाथ्रड देवी, धामणगाव (देव), तोरनाळा, भुलाई, कोलवाई, भांडेगाव, हातगाव, पाळोदी, पांढुर्णा, कुºहाड, मुंढळ, हातगाव, बोधगव्हाण, माळेगाव, तपोना येथे ७५ हजार रोपटी तयार झाली. श्रमदानातून परिसरातील सलग समतल चरखाली, तळ्याच्या काठावर, शाळा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकºयांनी घेतली आहे. ‘आपलं गावं’ हिरवगार करायचा संकल्प गावकºयांनी सोडला आहे.रोपांसाठी शासनाचा छदामही खर्च झाला नाहीवृक्षारोपणासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्चून रोपवाटिका तयार केली जाते. मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे आणि इतर अधिकारी व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात पहिल्यांदाच लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यात आली. यात शासनाचा छदामही खर्च झाला नाही. यामुळे लोकसहभाग व श्रमदानातून होणारे वृक्षारोपण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा