शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

२० पाणीदार गावे होणार हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:25 IST

वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : लोकसहभागातून ७५ हजार रोपटी

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्याची निवड झाल्यानंतर ५० गावे त्यात सहभागी झाली. यापैकी २० गावांनी रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काशीद, करंज, कडूनिंब, पिंपळ, वड, शेवगा, सीताफळ आदी प्रकारच्या फुले, फळे तसेच सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या बियांची निवड केली. श्रमदानातून गोळा केलेला तळ्यातील गाळ, दर्जेदार माती, वाळू, शेणखत आदी मिश्रण करून त्यात रोपे लावण्यात आली. या रोपट्यांना सावली मिळावी म्हणून शेडनेटची व्यवस्था केली.गेल्या दोन महिन्यात लोही, बोरी, लाखखिंड, हातोला, खोपडी, पाथ्रड देवी, धामणगाव (देव), तोरनाळा, भुलाई, कोलवाई, भांडेगाव, हातगाव, पाळोदी, पांढुर्णा, कुºहाड, मुंढळ, हातगाव, बोधगव्हाण, माळेगाव, तपोना येथे ७५ हजार रोपटी तयार झाली. श्रमदानातून परिसरातील सलग समतल चरखाली, तळ्याच्या काठावर, शाळा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकºयांनी घेतली आहे. ‘आपलं गावं’ हिरवगार करायचा संकल्प गावकºयांनी सोडला आहे.रोपांसाठी शासनाचा छदामही खर्च झाला नाहीवृक्षारोपणासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्चून रोपवाटिका तयार केली जाते. मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे आणि इतर अधिकारी व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात पहिल्यांदाच लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यात आली. यात शासनाचा छदामही खर्च झाला नाही. यामुळे लोकसहभाग व श्रमदानातून होणारे वृक्षारोपण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा