शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

१९८ ग्रामपंचायतींच्या नळ योजनेची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:40 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये हाहाकार : ४५३ ग्रामपंचायती वितरणच्या रडारवर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे गावागावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बिल थकीत आहे. सध्या सत्तारुढ असलेल्या सरपंचावर या बिलाचा भार येऊन पडला आहे. आधीच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत बिल कसे भरावे, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी वीज वितरण कंपनीला विनंती करून पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, असे म्हटले आहे. मात्र कंपनीने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. तर विरोधी गट याचा राजकीय फायदा घेत आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थकीत वीज बिलासाठी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांना विनंती केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीने थकीत बिलाची ७५ टक्के रक्कम भरावीच लागेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ग्रामपंचायती हतबल झाल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरायचे म्हटले तर गटविकास अधिकारी त्याला विरोध करीत आहे. ग्रामपंचायतीजवळ वसुलीची रक्कमही अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी सरपंचांना वीज बिल भरण्यासाठी स्वत:च्या क्रेडीटवर कर्ज उभारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरपंच चांगलेच अडचणीत आले आहे. दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव पाणीटंचाईने होरपळत आहे. गावकरी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे.सरपंचांची वीज वितरणकडे धावथकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक गावातील सरपंच गुरुवारी यवतमाळ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तासभर सरपंच या कक्षात ठिय्या देऊन होते. यावेळी दारव्हा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपस्थित होते. त्यात चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, चाणीचे सदस्य सुशील ठोकळ, बानायतचे सरपंच संदीप देवकते, कामठवाड्याचे सरपंच प्रतिनिधी उमेश उके यांचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत