शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

१९८ ग्रामपंचायतींच्या नळ योजनेची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:40 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये हाहाकार : ४५३ ग्रामपंचायती वितरणच्या रडारवर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे गावागावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बिल थकीत आहे. सध्या सत्तारुढ असलेल्या सरपंचावर या बिलाचा भार येऊन पडला आहे. आधीच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत बिल कसे भरावे, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी वीज वितरण कंपनीला विनंती करून पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, असे म्हटले आहे. मात्र कंपनीने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. तर विरोधी गट याचा राजकीय फायदा घेत आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थकीत वीज बिलासाठी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांना विनंती केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीने थकीत बिलाची ७५ टक्के रक्कम भरावीच लागेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ग्रामपंचायती हतबल झाल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरायचे म्हटले तर गटविकास अधिकारी त्याला विरोध करीत आहे. ग्रामपंचायतीजवळ वसुलीची रक्कमही अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी सरपंचांना वीज बिल भरण्यासाठी स्वत:च्या क्रेडीटवर कर्ज उभारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरपंच चांगलेच अडचणीत आले आहे. दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव पाणीटंचाईने होरपळत आहे. गावकरी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे.सरपंचांची वीज वितरणकडे धावथकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक गावातील सरपंच गुरुवारी यवतमाळ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तासभर सरपंच या कक्षात ठिय्या देऊन होते. यावेळी दारव्हा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपस्थित होते. त्यात चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, चाणीचे सदस्य सुशील ठोकळ, बानायतचे सरपंच संदीप देवकते, कामठवाड्याचे सरपंच प्रतिनिधी उमेश उके यांचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत