शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

यवतमाळ पालिका क्षेत्रात 19 अनधिकृत वसाहती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : रोगराईला वाव, आरोग्य धोक्यात

 सुरेंद्र राऊत    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात विस्तारापूर्वी २१ अनधिकृत वस्त्या होत्या. यातील बहुतांश वस्त्या नियमानुकूल करण्यात आल्या. आता शहराचा विस्तार झाल्यानंतर सात ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यामुळे अतिक्रमित वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. १९ अतिक्रमित वस्त्या असून दहा हजार लोक त्यात वास्तव्याला आहे. काही वस्त्यांमध्ये प्रचंड समस्या आहेत. काही वस्त्या अवैध धंदे व गुन्हेगारांचे अड्डे बनल्या आहेत. यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. अंबानगर, इंदिरानगर या वस्त्यांमध्ये भीषण स्थिती आहे. अतिक्रमित वस्त्यांमध्ये अवैध दारू विक्री व गुन्हेगारीला पोषक वातावरण पहायला मिळते. अनधिकृत वसाहतीमध्ये अनेक सामाजिक स्वास्थ्याला घातक प्रवृती वाढत आहे. मात्र हा प्रभाव काही एका ठराविक भागापुरताच आहे. बऱ्याच ठिकाणी प्रामाणिकपणे मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा भागांमध्ये नगरपरिषदेकडून काही सुविधाही पुरविण्यात आल्या आहे. वाढीव क्षेत्रात नगरपरिषदेेत आलेल्या पूर्वीच्या ग्रामीण क्षेत्रात आता सर्वाधिक अनधिकृत वस्त्या आहेत. उमरसरा भागात पाच वस्त्या असून दोन हजारांच्यावर लोक तेथे वास्तव्याला आहे. लोहारा येथे शिवाजीनगर, वाघापूर बायपास मागे, शिवनगर, स्मशानभूमी लगतच्या तलाव परिसरात अतिक्रमित वस्ती आहे. मात्र ग्रामपंचायतीने या भागात सुविधा दिल्या होत्या. त्यांच्याकडून करही वसूल केला जात आहे. पिंपळगावमध्ये सावर पांदण रस्त्यावर अतिक्रमित वस्ती आहे. वडगावमध्ये वाघाडी, जनकनगरी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित आहे. तेथे चार हजारांवर नागरिक वास्तव्याला आहेत. 

अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन काही प्रमाणात करणे शक्य आहे. शहरात तीन हजार घरकुल मंजूर झाले आहे. आता अतिक्रमण वाढू नये यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. जुन्या अनधिकृत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. ही समस्या हाताळण्यासाठी संवेदनशीलता गरजेची आहे. अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण काढण्याकरिता पर्याय ठेवणेही आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.   - सुनील बल्लाळमुख्याधिकारी, नगरपरिषद. 

आम्ही अनेक वर्षांपासून या वस्तीमध्ये राहतो. घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला. आम्हाला घरकूल मिळणार असल्याचे सांगण्यातही आले. मात्र अजूनही कशाचाच पत्ता नाही. आमच्या भागात खंब्यावर लाईट लागत नाही. शौचालय नीटनेटके नाहीत. पिण्याचे पाणी मिळत नाही. रस्ता रुंदीकरणात लाईन कट झाली. तेव्हापासून पाण्याचे हाल आहे.  नळाचे कनेक्शन कटले आणि नळाचे बिल सुरू झाले. चार हजार रुपयांचे बिल आम्हाला मिळाले. आता पाणीच नाही, आम्ही इतकाले बिल कोठून भरायचे असे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले.- कल्पना संजय कुटेनागरिक, वाघापूर 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण