शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

यवतमाळ पालिका क्षेत्रात 19 अनधिकृत वसाहती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : रोगराईला वाव, आरोग्य धोक्यात

 सुरेंद्र राऊत    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात विस्तारापूर्वी २१ अनधिकृत वस्त्या होत्या. यातील बहुतांश वस्त्या नियमानुकूल करण्यात आल्या. आता शहराचा विस्तार झाल्यानंतर सात ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यामुळे अतिक्रमित वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. १९ अतिक्रमित वस्त्या असून दहा हजार लोक त्यात वास्तव्याला आहे. काही वस्त्यांमध्ये प्रचंड समस्या आहेत. काही वस्त्या अवैध धंदे व गुन्हेगारांचे अड्डे बनल्या आहेत. यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. अंबानगर, इंदिरानगर या वस्त्यांमध्ये भीषण स्थिती आहे. अतिक्रमित वस्त्यांमध्ये अवैध दारू विक्री व गुन्हेगारीला पोषक वातावरण पहायला मिळते. अनधिकृत वसाहतीमध्ये अनेक सामाजिक स्वास्थ्याला घातक प्रवृती वाढत आहे. मात्र हा प्रभाव काही एका ठराविक भागापुरताच आहे. बऱ्याच ठिकाणी प्रामाणिकपणे मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा भागांमध्ये नगरपरिषदेकडून काही सुविधाही पुरविण्यात आल्या आहे. वाढीव क्षेत्रात नगरपरिषदेेत आलेल्या पूर्वीच्या ग्रामीण क्षेत्रात आता सर्वाधिक अनधिकृत वस्त्या आहेत. उमरसरा भागात पाच वस्त्या असून दोन हजारांच्यावर लोक तेथे वास्तव्याला आहे. लोहारा येथे शिवाजीनगर, वाघापूर बायपास मागे, शिवनगर, स्मशानभूमी लगतच्या तलाव परिसरात अतिक्रमित वस्ती आहे. मात्र ग्रामपंचायतीने या भागात सुविधा दिल्या होत्या. त्यांच्याकडून करही वसूल केला जात आहे. पिंपळगावमध्ये सावर पांदण रस्त्यावर अतिक्रमित वस्ती आहे. वडगावमध्ये वाघाडी, जनकनगरी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित आहे. तेथे चार हजारांवर नागरिक वास्तव्याला आहेत. 

अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन काही प्रमाणात करणे शक्य आहे. शहरात तीन हजार घरकुल मंजूर झाले आहे. आता अतिक्रमण वाढू नये यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. जुन्या अनधिकृत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. ही समस्या हाताळण्यासाठी संवेदनशीलता गरजेची आहे. अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण काढण्याकरिता पर्याय ठेवणेही आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.   - सुनील बल्लाळमुख्याधिकारी, नगरपरिषद. 

आम्ही अनेक वर्षांपासून या वस्तीमध्ये राहतो. घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला. आम्हाला घरकूल मिळणार असल्याचे सांगण्यातही आले. मात्र अजूनही कशाचाच पत्ता नाही. आमच्या भागात खंब्यावर लाईट लागत नाही. शौचालय नीटनेटके नाहीत. पिण्याचे पाणी मिळत नाही. रस्ता रुंदीकरणात लाईन कट झाली. तेव्हापासून पाण्याचे हाल आहे.  नळाचे कनेक्शन कटले आणि नळाचे बिल सुरू झाले. चार हजार रुपयांचे बिल आम्हाला मिळाले. आता पाणीच नाही, आम्ही इतकाले बिल कोठून भरायचे असे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले.- कल्पना संजय कुटेनागरिक, वाघापूर 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण