शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

जिल्ह्यातील १८७ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:34 IST

गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी हवे १५ कोटी । नवीन ३८ पूल होणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.१६ तालुक्यांमध्ये हजारो किलोमिटर रस्त्यांचे जाळे आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले पूल पुरासह इतर कारणांमुळे डागडुजीला आले आहेत. काही पुलांच्या रेलींग तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी सिमेंट कोटींगही निघाले आहे. या पुलांची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला १५ कोटी रूपयांची गरज आहे.प्रादेशिक कार्यालयाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. मात्र, हा निधी अद्यापही जिल्ह्याकडे वळता झाला नाही. दुरूस्ती न झाल्यास पुलांची स्थिती पुढील वर्षी आणखी खराब होणार आहे.पैनगंगा, अडाणवर नवे पूल होणारजिल्ह्यात ३८ ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहे. त्याकरिता ११५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पैनगंगा नदीपात्रावर सर्वात मोठा ३०० मिटरचा पूल उभारण्यात येणार आहे. याकरिता २५ कोटी मंजूर झाले आहे. वणी ते चंद्रपूर मार्गावरील हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. तर अडाण नदीवर बोरीअरबमध्ये ८ कोटींचा नवा उंच व रूंद पूल होणार आहे.रेलिंगविना रस्त्याचा अंदाजच येत नाहीरात्रीच्या वेळी वाहनांना पुलाच्या परिसरात हद्द कळण्यासाठी रेलींग आवश्यक आहे. अंधारात रस्त्याची हद्द वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होतो. पुराच्या वेळीही रस्त्याचा अंदाज चुकून नदीपात्रात वाहन जाण्याचा धोका आहे.पुलाचे सायरन गुराख्याने पळविलेदोन वर्षांपूर्वी सात पुलांवर सायरन यंत्रणा लावण्यात आली. मात्र पुलाखाली लावलेले सायरनचे साहित्य एका गुराख्याने काढून नेले. यामुळे पाऊस नसतानाही अभियंत्यांना अलर्ट मेसेज आलेत. या ठिकाणी बांधकाम विभागाची यंत्रणा पोहचली. तत्पूर्वीच यंत्रसामुग्री गुल झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर