शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

जिल्ह्यातील १८७ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:34 IST

गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी हवे १५ कोटी । नवीन ३८ पूल होणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.१६ तालुक्यांमध्ये हजारो किलोमिटर रस्त्यांचे जाळे आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले पूल पुरासह इतर कारणांमुळे डागडुजीला आले आहेत. काही पुलांच्या रेलींग तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी सिमेंट कोटींगही निघाले आहे. या पुलांची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला १५ कोटी रूपयांची गरज आहे.प्रादेशिक कार्यालयाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. मात्र, हा निधी अद्यापही जिल्ह्याकडे वळता झाला नाही. दुरूस्ती न झाल्यास पुलांची स्थिती पुढील वर्षी आणखी खराब होणार आहे.पैनगंगा, अडाणवर नवे पूल होणारजिल्ह्यात ३८ ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहे. त्याकरिता ११५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पैनगंगा नदीपात्रावर सर्वात मोठा ३०० मिटरचा पूल उभारण्यात येणार आहे. याकरिता २५ कोटी मंजूर झाले आहे. वणी ते चंद्रपूर मार्गावरील हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. तर अडाण नदीवर बोरीअरबमध्ये ८ कोटींचा नवा उंच व रूंद पूल होणार आहे.रेलिंगविना रस्त्याचा अंदाजच येत नाहीरात्रीच्या वेळी वाहनांना पुलाच्या परिसरात हद्द कळण्यासाठी रेलींग आवश्यक आहे. अंधारात रस्त्याची हद्द वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होतो. पुराच्या वेळीही रस्त्याचा अंदाज चुकून नदीपात्रात वाहन जाण्याचा धोका आहे.पुलाचे सायरन गुराख्याने पळविलेदोन वर्षांपूर्वी सात पुलांवर सायरन यंत्रणा लावण्यात आली. मात्र पुलाखाली लावलेले सायरनचे साहित्य एका गुराख्याने काढून नेले. यामुळे पाऊस नसतानाही अभियंत्यांना अलर्ट मेसेज आलेत. या ठिकाणी बांधकाम विभागाची यंत्रणा पोहचली. तत्पूर्वीच यंत्रसामुग्री गुल झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर