शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

जिल्ह्यातील १८७ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:34 IST

गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी हवे १५ कोटी । नवीन ३८ पूल होणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.१६ तालुक्यांमध्ये हजारो किलोमिटर रस्त्यांचे जाळे आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले पूल पुरासह इतर कारणांमुळे डागडुजीला आले आहेत. काही पुलांच्या रेलींग तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी सिमेंट कोटींगही निघाले आहे. या पुलांची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला १५ कोटी रूपयांची गरज आहे.प्रादेशिक कार्यालयाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. मात्र, हा निधी अद्यापही जिल्ह्याकडे वळता झाला नाही. दुरूस्ती न झाल्यास पुलांची स्थिती पुढील वर्षी आणखी खराब होणार आहे.पैनगंगा, अडाणवर नवे पूल होणारजिल्ह्यात ३८ ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहे. त्याकरिता ११५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पैनगंगा नदीपात्रावर सर्वात मोठा ३०० मिटरचा पूल उभारण्यात येणार आहे. याकरिता २५ कोटी मंजूर झाले आहे. वणी ते चंद्रपूर मार्गावरील हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. तर अडाण नदीवर बोरीअरबमध्ये ८ कोटींचा नवा उंच व रूंद पूल होणार आहे.रेलिंगविना रस्त्याचा अंदाजच येत नाहीरात्रीच्या वेळी वाहनांना पुलाच्या परिसरात हद्द कळण्यासाठी रेलींग आवश्यक आहे. अंधारात रस्त्याची हद्द वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास अपघात होतो. पुराच्या वेळीही रस्त्याचा अंदाज चुकून नदीपात्रात वाहन जाण्याचा धोका आहे.पुलाचे सायरन गुराख्याने पळविलेदोन वर्षांपूर्वी सात पुलांवर सायरन यंत्रणा लावण्यात आली. मात्र पुलाखाली लावलेले सायरनचे साहित्य एका गुराख्याने काढून नेले. यामुळे पाऊस नसतानाही अभियंत्यांना अलर्ट मेसेज आलेत. या ठिकाणी बांधकाम विभागाची यंत्रणा पोहचली. तत्पूर्वीच यंत्रसामुग्री गुल झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर