शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
4
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
5
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
6
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
7
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
8
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
9
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
10
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
11
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
12
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
13
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
14
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
15
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
16
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
17
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
18
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
19
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

By admin | Updated: February 8, 2015 23:39 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक

७ मार्चपूर्वी वितरण : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा, प्रशासन लागले कामालायवतमाळ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक विम्याचे ६१ कोटी १५ लाख असे एकूण १८३ कोटी ९५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. दुष्काळी मदतीचे वितरण ७ मार्चपूर्वी करण्याचे आदेश असून पीक विम्याची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात अपुऱ्या पावसाने आठ लाख हेक्टरवरील पीक होरपळले होते. यातून पाच लाख शेतकरी कुटुंब संकटात सापडले होते. या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील १२२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. आता त्या पाठोपाठ १२२ कोटी ८० लाख रुपये मदतीचा दुसरा टप्पाही जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी हा निधी तहसीलदारांकडे वळता करण्यात आला आहे. सदर निधी ७ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासन त्या दृष्टीने कामाला लागले आहे. यवतमाळ तालुक्यासाठी ८ कोटी २६ लाख, कळंब ६ कोटी ७१ लाख, बाभूळगाव पाच कोटी ८५ लाख, आर्णी सात कोटी ९१ लाख, दारव्हा आठ कोटी ९७ लाख, नेर सात कोटी ५७ लाख, दिग्रस ५ कोटी ९२ लाख, पुसद १० कोटी १७ लाख, उमरखेड ७ कोटी नऊ लाख, महागाव ७ कोटी ९० लाख, राळेगाव ८ कोटी २७ लाख, घाटंजी ९ कोटी १३ लाख, केळापूर ६ कोटी ७७ लाख, झरी ५ कोटी ८० लाख, वणी ९ कोटी १८ लाख आणि मारेगाव ६ कोटी चार लाख असे १२२ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त झाले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ही मदतही अपुरीच ठरणारी आहे. (शहर वार्ताहर)दीड लाख शेतकऱ्यांना विम्याचा लाभजिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून दीड लाख शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. याचा लाभा जिल्ह्यातील १६ तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार ६०१ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतक ऱ्यांना नुकसानीपोटी ६१ कोटी १५ लाख ६० हजार १२० रुपयांची मदत दिली जाणार आहे. कापसाची लागवड करणारे ८१ हजार ७९३ शेतकऱ्यांना ५२ कोटी ३९ लाख ५८ हजार ७६ रूपयांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी आणि झरी तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. सोयाबीन उत्पादक ६६ हजार १७८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख ७१ हजार १५९ रूपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मुगाची पेरणी करणाऱ्या ३७४ शेतकऱ्यांना २ लाख ७७ हजार २१४ रूपयांचा पीक विमा दिला जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभुळगाव, दारव्हा, घाटंजी, कळंब, महागाव, नेर, यवतमाळ आणि झरी तालुक्याचा समावेश आहे. उडीद पिकाचे २५६ शेतकऱ्यांना एक लाख ५३ हजार ६६९ रुपये मिळणार आहे.