शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

By admin | Updated: February 8, 2015 23:39 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक

७ मार्चपूर्वी वितरण : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा, प्रशासन लागले कामालायवतमाळ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक विम्याचे ६१ कोटी १५ लाख असे एकूण १८३ कोटी ९५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. दुष्काळी मदतीचे वितरण ७ मार्चपूर्वी करण्याचे आदेश असून पीक विम्याची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात अपुऱ्या पावसाने आठ लाख हेक्टरवरील पीक होरपळले होते. यातून पाच लाख शेतकरी कुटुंब संकटात सापडले होते. या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील १२२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. आता त्या पाठोपाठ १२२ कोटी ८० लाख रुपये मदतीचा दुसरा टप्पाही जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी हा निधी तहसीलदारांकडे वळता करण्यात आला आहे. सदर निधी ७ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासन त्या दृष्टीने कामाला लागले आहे. यवतमाळ तालुक्यासाठी ८ कोटी २६ लाख, कळंब ६ कोटी ७१ लाख, बाभूळगाव पाच कोटी ८५ लाख, आर्णी सात कोटी ९१ लाख, दारव्हा आठ कोटी ९७ लाख, नेर सात कोटी ५७ लाख, दिग्रस ५ कोटी ९२ लाख, पुसद १० कोटी १७ लाख, उमरखेड ७ कोटी नऊ लाख, महागाव ७ कोटी ९० लाख, राळेगाव ८ कोटी २७ लाख, घाटंजी ९ कोटी १३ लाख, केळापूर ६ कोटी ७७ लाख, झरी ५ कोटी ८० लाख, वणी ९ कोटी १८ लाख आणि मारेगाव ६ कोटी चार लाख असे १२२ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त झाले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ही मदतही अपुरीच ठरणारी आहे. (शहर वार्ताहर)दीड लाख शेतकऱ्यांना विम्याचा लाभजिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून दीड लाख शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. याचा लाभा जिल्ह्यातील १६ तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार ६०१ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतक ऱ्यांना नुकसानीपोटी ६१ कोटी १५ लाख ६० हजार १२० रुपयांची मदत दिली जाणार आहे. कापसाची लागवड करणारे ८१ हजार ७९३ शेतकऱ्यांना ५२ कोटी ३९ लाख ५८ हजार ७६ रूपयांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी आणि झरी तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. सोयाबीन उत्पादक ६६ हजार १७८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७१ लाख ७१ हजार १५९ रूपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मुगाची पेरणी करणाऱ्या ३७४ शेतकऱ्यांना २ लाख ७७ हजार २१४ रूपयांचा पीक विमा दिला जाणार आहे. यामध्ये आर्णी, बाभुळगाव, दारव्हा, घाटंजी, कळंब, महागाव, नेर, यवतमाळ आणि झरी तालुक्याचा समावेश आहे. उडीद पिकाचे २५६ शेतकऱ्यांना एक लाख ५३ हजार ६६९ रुपये मिळणार आहे.