शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात काेराेना लसीकरण नाेव्हेंबर अखेरपर्यंत संपविण्याचा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी आराेग्य यंत्रणेला दिला आहे. यासाठी शहरी भागात नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश आहेत. यामुळे काेराेना लसीकरणासाठी केवळ ६६ दिवस हातात असून १८ लाख ४ हजार १४० नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान उभे ठाकले आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर या सात महिन्यांत केवळ तीन लाख ३३ हजार ४७२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अनेक अडचणींना पार करत हा टप्पा गाठता आला आहे. काेराेना महामारीतून सुटका मिळवायची असेल तर लसीकरणच एकमेव पर्याय मानला जात आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील  २१ लाख ३७ हजार ६१२  नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार १५१ नागरिकांना पहिला डाेस देण्यात आला असून याची टक्केवारी ४३.६५ इतकी आहे. तर दुसरा डाेस हा ३ लाख ३३ हजार ४७२ नागरिकांना दिला असून त्याची टक्केवारी १५.६० इतकी आहे.  पहिला व दुसरा डाेस मिळून १२ लाख ६६ हजार ६२३ नागरिकांनी घेतला आहे. अजून पूर्ण लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी बरीच मजल आराेग्य यंत्रणेला मारायची आहे. आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक जणांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्याची टाळाटाळ केली आहे. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही दुसरा डोस घेण्यास तयार नाही. याशिवाय पहिला डोस न घेणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात जनजागृती करण्याची नव्याने गरज निर्माण झाली आहे. तरच निर्धारित वेळेत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. 

लसीकरणाचे असे केले नियाेजन काेराेना लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आराेग्य विभागाने फेर नियाेजन केले आहे. आता पहिला फाेकस हा नगरपरिषद क्षेत्रात राहणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी, तालुका आराेग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना संयुक्तपणे नियाेजन करायचे आहे. नगरपरिषदेची यंत्रणाही लसीकरणाच्या कामाला लागणार आहे. शहरात आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत किमान तीन गावांत लसीकरण केले जाणार आहे. लस उपलब्ध असल्यास ही संख्या वाढविता येणार आहे. या नियाेजनाच्या आधारावर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या