शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:39 IST

भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसडीपीओ पीयूष जगताप : रियल इस्टेटच्या संरक्षणासाठी १५ कलमी टिप्स्

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.एसडीपीओ जगताप म्हणाले, भूखंडासंबंधी पोलिसांकडे येत असलेल्या तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना तपासाचा तेवढा अनुभव नसतो. त्यामुळेच आधीच कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच फिर्याद नोंदवून घेतली जात आहे. राकेश यादव व मंगेश पन्हाळकर यांच्या विरोधात २०१६ मध्ये पहिला गुन्हा नोंदविला गेला. परंतु त्यावेळी योग्य दिशेने तपास होऊ शकला नाही. या टोळीविरुद्ध आता सद्यस्थितीत तीन गुन्हे नोंदविले गेले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात तक्रारी येतच आहे. पोलिसांचा तपास सध्या ‘बनावट दस्त तयार झाले कसे’ या मुद्यावर केंद्रीत आहे. दुसऱ्या टप्प्यात या बनावट दस्तांचा वापर कुठे व कसा झाला याचा तपास केला जात आहे.दस्त रद्द करण्याची सोयज्यांच्या भूखंडाचे बनावट दस्त तयार करून परस्पर व्यवहार झाले त्यांना उपविभागीय दंडाधिकारी अथवा न्यायालयातून बनावट दस्त रद्द करून घेण्याची सोय आहे. त्यासाठी एफआयआरची प्रत जोडून संबंधिताकडे अर्ज करता येणार आहे.तीन बँका रडारवरभूखंड घोटाळ्यात येथील दि यवतमाळ अर्बन को.आॅप., बाबाजी दाते महिला सहकारी बँक आणि गोदावरी मल्टीस्टेट या तीन बँका पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, भूखंडावरील या कर्ज प्रकरणात उपरोक्त बँकांमधील यंत्रणा गुंतलेली असण्याचा दाट संशय आहे. त्यांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर होणे, वर्षानुवर्षे सातबारा, मिळकत पत्रिकेवर बोझा न चढणे शक्य नसल्याचे जगताप म्हणाले.अशी आहे एसडीपीओंची १५ कलमीआपला भूखंड सुरक्षित आहे की नाही व तो भविष्यात सुरक्षित ठेवता यावा यासाठी एसडीपीओ पीयूष जगताप यांनी १५ कलमी टीप्स् नागरिकांसाठी दिल्या आहेत. त्यानुसार सौदेपत्र, इसार चिठ्ठी, नोटरीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, भूखंडाला कंपाऊंड घाला, तेथे नामफलक लावा, त्यावर दस्त क्रमांक, मोबाईल क्रमांक लिहा, जमिनीचा अकृषक करून घ्या, चालू तारखेचा सातबारा काढा, आखीव पत्रिका मिळवा, गेल्या ३० वर्षातील फेरफार तपासा, तलाठ्याला प्रत्यक्ष भेटा, हिस्सेदार कोण, वारसदार कोण हे आधी तपासा, मूळ मालक कोण हे तपासल्याशिवाय प्रॉपर्टीचे व्यवहार करू नका, शंभर रुपयापेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार नोंदणीकृत करा, बँकेचा बोझा तपासा, अर्जनविसाने लिहिलेला मजकूर आवर्जुन तपासून घ्या कारण अनेक प्रकरणात या मजकुरात मोठी तफावत आढळून आली असल्याची माहिती पीयूष जगताप यांनी पत्रकारांना दिली.सर्व ठाणेदारांना निर्देशभूखंड व्यवहारासंबंधी तक्रार आल्यास पोलीस ती ‘दिवाणी प्रकरण’ म्हणून परत पाठवितात. परंतु अशा तक्रारी परत पाठवू नका, फिर्यादीकडून सविस्तर कागदपत्रे व माहिती घ्या, नंतर गुन्हा दाखल करा अथवा प्रकरण एसआयटीकडे पाठवा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना देण्यात आल्याचे एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस