शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:39 IST

भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसडीपीओ पीयूष जगताप : रियल इस्टेटच्या संरक्षणासाठी १५ कलमी टिप्स्

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.एसडीपीओ जगताप म्हणाले, भूखंडासंबंधी पोलिसांकडे येत असलेल्या तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना तपासाचा तेवढा अनुभव नसतो. त्यामुळेच आधीच कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच फिर्याद नोंदवून घेतली जात आहे. राकेश यादव व मंगेश पन्हाळकर यांच्या विरोधात २०१६ मध्ये पहिला गुन्हा नोंदविला गेला. परंतु त्यावेळी योग्य दिशेने तपास होऊ शकला नाही. या टोळीविरुद्ध आता सद्यस्थितीत तीन गुन्हे नोंदविले गेले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात तक्रारी येतच आहे. पोलिसांचा तपास सध्या ‘बनावट दस्त तयार झाले कसे’ या मुद्यावर केंद्रीत आहे. दुसऱ्या टप्प्यात या बनावट दस्तांचा वापर कुठे व कसा झाला याचा तपास केला जात आहे.दस्त रद्द करण्याची सोयज्यांच्या भूखंडाचे बनावट दस्त तयार करून परस्पर व्यवहार झाले त्यांना उपविभागीय दंडाधिकारी अथवा न्यायालयातून बनावट दस्त रद्द करून घेण्याची सोय आहे. त्यासाठी एफआयआरची प्रत जोडून संबंधिताकडे अर्ज करता येणार आहे.तीन बँका रडारवरभूखंड घोटाळ्यात येथील दि यवतमाळ अर्बन को.आॅप., बाबाजी दाते महिला सहकारी बँक आणि गोदावरी मल्टीस्टेट या तीन बँका पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, भूखंडावरील या कर्ज प्रकरणात उपरोक्त बँकांमधील यंत्रणा गुंतलेली असण्याचा दाट संशय आहे. त्यांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर होणे, वर्षानुवर्षे सातबारा, मिळकत पत्रिकेवर बोझा न चढणे शक्य नसल्याचे जगताप म्हणाले.अशी आहे एसडीपीओंची १५ कलमीआपला भूखंड सुरक्षित आहे की नाही व तो भविष्यात सुरक्षित ठेवता यावा यासाठी एसडीपीओ पीयूष जगताप यांनी १५ कलमी टीप्स् नागरिकांसाठी दिल्या आहेत. त्यानुसार सौदेपत्र, इसार चिठ्ठी, नोटरीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, भूखंडाला कंपाऊंड घाला, तेथे नामफलक लावा, त्यावर दस्त क्रमांक, मोबाईल क्रमांक लिहा, जमिनीचा अकृषक करून घ्या, चालू तारखेचा सातबारा काढा, आखीव पत्रिका मिळवा, गेल्या ३० वर्षातील फेरफार तपासा, तलाठ्याला प्रत्यक्ष भेटा, हिस्सेदार कोण, वारसदार कोण हे आधी तपासा, मूळ मालक कोण हे तपासल्याशिवाय प्रॉपर्टीचे व्यवहार करू नका, शंभर रुपयापेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार नोंदणीकृत करा, बँकेचा बोझा तपासा, अर्जनविसाने लिहिलेला मजकूर आवर्जुन तपासून घ्या कारण अनेक प्रकरणात या मजकुरात मोठी तफावत आढळून आली असल्याची माहिती पीयूष जगताप यांनी पत्रकारांना दिली.सर्व ठाणेदारांना निर्देशभूखंड व्यवहारासंबंधी तक्रार आल्यास पोलीस ती ‘दिवाणी प्रकरण’ म्हणून परत पाठवितात. परंतु अशा तक्रारी परत पाठवू नका, फिर्यादीकडून सविस्तर कागदपत्रे व माहिती घ्या, नंतर गुन्हा दाखल करा अथवा प्रकरण एसआयटीकडे पाठवा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना देण्यात आल्याचे एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस