शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांविरोधात आणखी १७ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:39 IST

भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसडीपीओ पीयूष जगताप : रियल इस्टेटच्या संरक्षणासाठी १५ कलमी टिप्स्

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.एसडीपीओ जगताप म्हणाले, भूखंडासंबंधी पोलिसांकडे येत असलेल्या तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना तपासाचा तेवढा अनुभव नसतो. त्यामुळेच आधीच कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच फिर्याद नोंदवून घेतली जात आहे. राकेश यादव व मंगेश पन्हाळकर यांच्या विरोधात २०१६ मध्ये पहिला गुन्हा नोंदविला गेला. परंतु त्यावेळी योग्य दिशेने तपास होऊ शकला नाही. या टोळीविरुद्ध आता सद्यस्थितीत तीन गुन्हे नोंदविले गेले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात तक्रारी येतच आहे. पोलिसांचा तपास सध्या ‘बनावट दस्त तयार झाले कसे’ या मुद्यावर केंद्रीत आहे. दुसऱ्या टप्प्यात या बनावट दस्तांचा वापर कुठे व कसा झाला याचा तपास केला जात आहे.दस्त रद्द करण्याची सोयज्यांच्या भूखंडाचे बनावट दस्त तयार करून परस्पर व्यवहार झाले त्यांना उपविभागीय दंडाधिकारी अथवा न्यायालयातून बनावट दस्त रद्द करून घेण्याची सोय आहे. त्यासाठी एफआयआरची प्रत जोडून संबंधिताकडे अर्ज करता येणार आहे.तीन बँका रडारवरभूखंड घोटाळ्यात येथील दि यवतमाळ अर्बन को.आॅप., बाबाजी दाते महिला सहकारी बँक आणि गोदावरी मल्टीस्टेट या तीन बँका पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, भूखंडावरील या कर्ज प्रकरणात उपरोक्त बँकांमधील यंत्रणा गुंतलेली असण्याचा दाट संशय आहे. त्यांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर होणे, वर्षानुवर्षे सातबारा, मिळकत पत्रिकेवर बोझा न चढणे शक्य नसल्याचे जगताप म्हणाले.अशी आहे एसडीपीओंची १५ कलमीआपला भूखंड सुरक्षित आहे की नाही व तो भविष्यात सुरक्षित ठेवता यावा यासाठी एसडीपीओ पीयूष जगताप यांनी १५ कलमी टीप्स् नागरिकांसाठी दिल्या आहेत. त्यानुसार सौदेपत्र, इसार चिठ्ठी, नोटरीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, भूखंडाला कंपाऊंड घाला, तेथे नामफलक लावा, त्यावर दस्त क्रमांक, मोबाईल क्रमांक लिहा, जमिनीचा अकृषक करून घ्या, चालू तारखेचा सातबारा काढा, आखीव पत्रिका मिळवा, गेल्या ३० वर्षातील फेरफार तपासा, तलाठ्याला प्रत्यक्ष भेटा, हिस्सेदार कोण, वारसदार कोण हे आधी तपासा, मूळ मालक कोण हे तपासल्याशिवाय प्रॉपर्टीचे व्यवहार करू नका, शंभर रुपयापेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार नोंदणीकृत करा, बँकेचा बोझा तपासा, अर्जनविसाने लिहिलेला मजकूर आवर्जुन तपासून घ्या कारण अनेक प्रकरणात या मजकुरात मोठी तफावत आढळून आली असल्याची माहिती पीयूष जगताप यांनी पत्रकारांना दिली.सर्व ठाणेदारांना निर्देशभूखंड व्यवहारासंबंधी तक्रार आल्यास पोलीस ती ‘दिवाणी प्रकरण’ म्हणून परत पाठवितात. परंतु अशा तक्रारी परत पाठवू नका, फिर्यादीकडून सविस्तर कागदपत्रे व माहिती घ्या, नंतर गुन्हा दाखल करा अथवा प्रकरण एसआयटीकडे पाठवा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना देण्यात आल्याचे एसडीपीओ पीयूष जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस