शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

जिल्ह्यातील विजेची थकबाकी १६९६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

लाॅकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाईन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची माेहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही.

ठळक मुद्देचोरी रोखण्यासाठी विशिष्ट केबल : थकबाकीदारांमध्ये सव्वा लाख शेतकरी

रूपेश उत्तरवार    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने जिल्हाभरात चार लाख ९२ हजार ५१८ ग्राहकांना विजेचे कनेक्शन दिले आहे. यामध्ये कृषीपंपधारकांकडून वीज बिलाची वसुली झालीच नाही. यासह घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी कायम आहे. यामुळे थकबाकीचा आकडा १६९६ कोटींच्या घरात पोहोचला आहे. लाॅकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाईन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची माेहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही. तर दुसरीकडे वीज कंपनीकडील थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. जिल्ह्यात वीज कंपनीकडे १६९६ कोटी ५१ लाखांची थकबाकी आहे.

१२६२ कोटी थकलेजिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांकडे २९ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांकडे १६ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. तर कृषी पंपधारकांकडे १२६२ कोटी दोन लाखांची थकबाकी आहे. कृषीपंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी राहिली आहे. वसुलीसाठी वीज कंपनीला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

प्रत्येक गावांमध्ये घरोघरी वीज देण्याचा प्रयत्न  जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये वीज जोडणी करण्यासाठी वीज कंपनीमार्फत विविध योजना हाती घेण्यात आल्या. प्रत्येक घरांपर्यंत वीज देण्याचा प्रयत्न झाला. आता जिल्ह्यातील १८५३ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. वीज कंपनीच्या माहितीनुसार जिल्ह्यातील कुठलेही गाव वीज जोडणीपासून शिल्लक राहिलेले नाही. प्रत्येकांना वीज मिळाली. वीज नाही असे एकही घर जिल्हाभरात नसल्याचा दावा वीज महावितरण कंपनीकडून केला जात आहे. 

कृषिपंपावर भारनियमनविजेचे वितरण करताना कृषीपंपांना तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कृषीपंपांवर सिंचनासाठी रात्रीला जागल करावी लागत आहे. याशिवाय सर्वाधिक भारनियमन कृषी फिडरवरच कायम आहे. त्यामुळेच दिवसा सिंचनासाठी वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उद्यापासून शहरात वीज चोरांविरोधात मोहीम हाती घेतली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच वीज चोरांवर कारवाई करून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम तीव्र करण्यात आली आहे.- संजय चितळे, कार्यकारी अभियंता, यवतमाळ.

टॅग्स :electricityवीज