शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धावपळीत १६ हजार विद्यार्थ्यांचा लागेना थांगपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनववी पास झाल्यानंतर दहावीचा परीक्षा अर्जच भरला नाही : शिक्षण विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीतील सर्वच विद्यार्थी पास होऊन दहावीत पोहोचले. मात्र यातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्जच भरला नाही. त्यामुळे हे १६ हजार विद्यार्थी नेमके गेले कुठे? शाळाबाह्य झाले की, बालवयातच रोजगाराकडे वळले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. मात्र मार्च २०२१ च्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून केवळ २९ हजार १३६ विद्यार्थ्यांनीच  बोर्डाकडे अर्ज भरले. दहावीतील विद्यार्थी संख्या आणि परीक्षा अर्ज भरण्याची संख्या यात तब्बल १६ हजार ४२० इतकी तफावत आहे. हे १६ हजार विद्यार्थी नववीनंतरच शाळा सोडून गेले काय?, त्यांनी शिक्षण कायमचे सोडून दिले काय?, ते परजिल्ह्यात तर स्थलांतरित झाले नाही नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांच्या रोजगारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाला कायमचा रामराम ठोकल्याची भीतीही जिल्ह्यातील जाणकारांमधून  वर्तविली जात आहे. 

पटसंख्येचा घोळ कायम 

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधेच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्या दाखविण्यासाठी त्याला शाळाबाह्य म्हणून दाखविले जात नाही. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमध्ये ४४ हजार ४३२ विद्यार्थी पटावर होते. तर यंदा दहावीमध्ये ४५ हजार ५५६ विद्यार्थी दाखविण्यात आले. त्यामुळे अधिकचे विद्यार्थी कुठून आले हा प्रश्न आहे. यू-डायसमध्ये नोंदविलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्षात बोर्डाकडे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत आहे. 

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...- शाळेतून दुरावलेली मुले आता शाळाबाह्य होण्याचा धोका आहे. यावर्षी मोठी गळती झाली.- यापूर्वी जिल्ह्यात पटावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांपैकी क्वचित काही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नव्हते. मात्र यंदा हे प्रमाण काही हजारांवर गेले आहे. - कोरोना काळात पालकांचेही दुर्लक्ष झाले, मुलेही रोजगाराकडे वळली. याशिवाय बालविवाहांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले.  

ज्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज यंदा भरला नाही, कदाचित त्यांनी यावर्षी कोरोनामुळे ड्राॅप घेऊन पुढील वर्षी परीक्षा देण्याचा विचार केला असेल. ज्यांनी फाॅर्म भरले नाही, त्यांचे काय करावे, याबाबत बोर्डाकडून काही गाईड लाईन मिळतात का याची माहिती घेऊ. - दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या