शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

कोरोनाच्या धावपळीत १६ हजार विद्यार्थ्यांचा लागेना थांगपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनववी पास झाल्यानंतर दहावीचा परीक्षा अर्जच भरला नाही : शिक्षण विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीतील सर्वच विद्यार्थी पास होऊन दहावीत पोहोचले. मात्र यातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्जच भरला नाही. त्यामुळे हे १६ हजार विद्यार्थी नेमके गेले कुठे? शाळाबाह्य झाले की, बालवयातच रोजगाराकडे वळले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. मात्र मार्च २०२१ च्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून केवळ २९ हजार १३६ विद्यार्थ्यांनीच  बोर्डाकडे अर्ज भरले. दहावीतील विद्यार्थी संख्या आणि परीक्षा अर्ज भरण्याची संख्या यात तब्बल १६ हजार ४२० इतकी तफावत आहे. हे १६ हजार विद्यार्थी नववीनंतरच शाळा सोडून गेले काय?, त्यांनी शिक्षण कायमचे सोडून दिले काय?, ते परजिल्ह्यात तर स्थलांतरित झाले नाही नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांच्या रोजगारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाला कायमचा रामराम ठोकल्याची भीतीही जिल्ह्यातील जाणकारांमधून  वर्तविली जात आहे. 

पटसंख्येचा घोळ कायम 

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधेच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्या दाखविण्यासाठी त्याला शाळाबाह्य म्हणून दाखविले जात नाही. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमध्ये ४४ हजार ४३२ विद्यार्थी पटावर होते. तर यंदा दहावीमध्ये ४५ हजार ५५६ विद्यार्थी दाखविण्यात आले. त्यामुळे अधिकचे विद्यार्थी कुठून आले हा प्रश्न आहे. यू-डायसमध्ये नोंदविलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्षात बोर्डाकडे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत आहे. 

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...- शाळेतून दुरावलेली मुले आता शाळाबाह्य होण्याचा धोका आहे. यावर्षी मोठी गळती झाली.- यापूर्वी जिल्ह्यात पटावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांपैकी क्वचित काही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नव्हते. मात्र यंदा हे प्रमाण काही हजारांवर गेले आहे. - कोरोना काळात पालकांचेही दुर्लक्ष झाले, मुलेही रोजगाराकडे वळली. याशिवाय बालविवाहांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले.  

ज्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज यंदा भरला नाही, कदाचित त्यांनी यावर्षी कोरोनामुळे ड्राॅप घेऊन पुढील वर्षी परीक्षा देण्याचा विचार केला असेल. ज्यांनी फाॅर्म भरले नाही, त्यांचे काय करावे, याबाबत बोर्डाकडून काही गाईड लाईन मिळतात का याची माहिती घेऊ. - दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या