शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

१६० शेतकऱ्यांची आत्महत्या अपात्र

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

जीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

विठ्ठल कांबळे घाटंजीजीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील १०६ कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर १६० शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. त्यामुळे होणारी सततची नापिकी. दारिद्र्य पाचवीला पुजलेले. शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत. सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही. शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा. यातून आलेले नैराश्य. या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो या भावनेपोटी त्यांनी केलेल्या आत्महत्या.२००९ मध्ये तर २४ पैकी केवळ दोन पात्र ठरल्या तर २२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. २०१० मध्ये २२ पैकी २१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत २९ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ पात्र, नऊ अपात्र तर तीन चौकशीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या सन २००७ व २००८ मध्ये प्रत्येकी ३० झाल्यात. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत हा आकडा २९ पर्यंत गेला. सन २०११ ते ११ डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात ४३ पात्र तर ५० अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. शेवटच्या तीन आत्महत्येविषयी तहसीलदार एम.एम. जोरवर चौकशी करत आहे. यानंतरच त्या पात्र की अपात्र हे ठरविले जाणार आहे. कोणी विष घेवून, गळफास लावून, जाळून घेत तर कोणी विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.