शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

१६० शेतकऱ्यांची आत्महत्या अपात्र

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

जीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

विठ्ठल कांबळे घाटंजीजीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील १०६ कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर १६० शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. त्यामुळे होणारी सततची नापिकी. दारिद्र्य पाचवीला पुजलेले. शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत. सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही. शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा. यातून आलेले नैराश्य. या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो या भावनेपोटी त्यांनी केलेल्या आत्महत्या.२००९ मध्ये तर २४ पैकी केवळ दोन पात्र ठरल्या तर २२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. २०१० मध्ये २२ पैकी २१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत २९ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ पात्र, नऊ अपात्र तर तीन चौकशीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या सन २००७ व २००८ मध्ये प्रत्येकी ३० झाल्यात. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत हा आकडा २९ पर्यंत गेला. सन २०११ ते ११ डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात ४३ पात्र तर ५० अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. शेवटच्या तीन आत्महत्येविषयी तहसीलदार एम.एम. जोरवर चौकशी करत आहे. यानंतरच त्या पात्र की अपात्र हे ठरविले जाणार आहे. कोणी विष घेवून, गळफास लावून, जाळून घेत तर कोणी विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.