शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार आॅटोरिक्षांना मीटरसक्ती

By admin | Updated: October 9, 2015 00:17 IST

यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : प्रवास भाडे आता मीटरनुसारच आकारणारयवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. विनामीटर आॅटोवर कारवाईचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यवतमाळ शहरात सुमारे एक हजार २०० तर जिल्हाभरात १६ हजार आॅटोरिक्षा आहेत. या आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक आहे. मात्र ते लावले जात नाही. प्रवाशांनाही मीटरनुसार भाडे देणे परवडत नाही. त्यात जवळच्या प्रवाशांना सोय तर दूरच्या प्रवाशांना गैरसोय होते. म्हणून आॅटोला मीटरच लावले जात नाही. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मीटरची ही सक्ती सुरुवातीला यवतमाळ शहरात व नंतर लगेच जिल्हाभरात केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने (डेप्युटी आरटीओ) विनामीटर आॅटोरिक्षांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत शंभरावर आॅटोंना चालान केले गेले. अनेक आॅटोरिक्षांना मीटर आहेत. परंतु ते बंद अवस्थेत आहेत. आरटीओची सक्ती पाहता आॅटोरिक्षा चालकांना तीन हजार रुपयांचे मीटर खरेदी करावे लागणार आहे. ही बाब आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसली तरी आॅटोचालकांनी त्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. मीटर लावल्यानंतर पहिला टप्पा १२ रुपये ५० पैसे तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर १० रुपये असा दर आकारला जाणार आहे. आॅटोला मीटर लावले तरी त्यासाठी बॅटरी लावावी लागते. अनेकांचे आॅटो घराबाहेर राहत असल्याने ही बॅटरी चोरी जाण्याची भीती असते. दररोज बॅटरी काढून घरात ठेवल्यास मीटरचे सेटिंग बिघडण्याची भीती असते. त्यामुळे मीटर व त्याच्या बॅटरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओने मोहीम सुरू करताच आॅटोरिक्षा चालकांनी संपूर्ण कागदपत्रे सोबत ठेवणे सुरू केले आहे. मीटरनुसार प्रवास भाडे देणे ग्राहकांना परवडणारे नाही. म्हणूनच आॅटो चालक मीटर लावणे टाळतात. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनीच सक्ती केल्याने व आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने आॅटो चालकांनी नाईलाजाने का होईना मीटर लावण्याची मानसिकता बनविली आहे. मीटरच्या सक्तीवर आॅटोरिक्षा चालकांच्या संघटना मात्र अद्याप मूग गिळून आहेत. यवतमाळ शहरच नव्हे तर वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र आॅटोरिक्षांना मीटर लावण्याची कारवाई केली जाणार आहे. आॅटोरिक्षा चालकांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या वाहनाला मीटर बसवावे, त्यानुसारच प्रवाशांना भाडे आकारावे असे आवाहन करताना येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी देशमुख यांनी नियमाचे पालन न केल्यास आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)