शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

१६ हजार आॅटोरिक्षांना मीटरसक्ती

By admin | Updated: October 9, 2015 00:17 IST

यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : प्रवास भाडे आता मीटरनुसारच आकारणारयवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. विनामीटर आॅटोवर कारवाईचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यवतमाळ शहरात सुमारे एक हजार २०० तर जिल्हाभरात १६ हजार आॅटोरिक्षा आहेत. या आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक आहे. मात्र ते लावले जात नाही. प्रवाशांनाही मीटरनुसार भाडे देणे परवडत नाही. त्यात जवळच्या प्रवाशांना सोय तर दूरच्या प्रवाशांना गैरसोय होते. म्हणून आॅटोला मीटरच लावले जात नाही. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मीटरची ही सक्ती सुरुवातीला यवतमाळ शहरात व नंतर लगेच जिल्हाभरात केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने (डेप्युटी आरटीओ) विनामीटर आॅटोरिक्षांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत शंभरावर आॅटोंना चालान केले गेले. अनेक आॅटोरिक्षांना मीटर आहेत. परंतु ते बंद अवस्थेत आहेत. आरटीओची सक्ती पाहता आॅटोरिक्षा चालकांना तीन हजार रुपयांचे मीटर खरेदी करावे लागणार आहे. ही बाब आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसली तरी आॅटोचालकांनी त्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. मीटर लावल्यानंतर पहिला टप्पा १२ रुपये ५० पैसे तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर १० रुपये असा दर आकारला जाणार आहे. आॅटोला मीटर लावले तरी त्यासाठी बॅटरी लावावी लागते. अनेकांचे आॅटो घराबाहेर राहत असल्याने ही बॅटरी चोरी जाण्याची भीती असते. दररोज बॅटरी काढून घरात ठेवल्यास मीटरचे सेटिंग बिघडण्याची भीती असते. त्यामुळे मीटर व त्याच्या बॅटरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओने मोहीम सुरू करताच आॅटोरिक्षा चालकांनी संपूर्ण कागदपत्रे सोबत ठेवणे सुरू केले आहे. मीटरनुसार प्रवास भाडे देणे ग्राहकांना परवडणारे नाही. म्हणूनच आॅटो चालक मीटर लावणे टाळतात. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनीच सक्ती केल्याने व आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने आॅटो चालकांनी नाईलाजाने का होईना मीटर लावण्याची मानसिकता बनविली आहे. मीटरच्या सक्तीवर आॅटोरिक्षा चालकांच्या संघटना मात्र अद्याप मूग गिळून आहेत. यवतमाळ शहरच नव्हे तर वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र आॅटोरिक्षांना मीटर लावण्याची कारवाई केली जाणार आहे. आॅटोरिक्षा चालकांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या वाहनाला मीटर बसवावे, त्यानुसारच प्रवाशांना भाडे आकारावे असे आवाहन करताना येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी देशमुख यांनी नियमाचे पालन न केल्यास आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)