शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडणीसाठी १६ वीज उपकेंद्र

By admin | Updated: April 16, 2016 01:53 IST

जिल्ह्यातील वीज वितरणासाठी पायाभूत सुविधांची उणीव आहे. त्यामुळेच ३० मार्च अखेरपर्यंत ७ हजार १६२ शेतकरी कृषी पंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

१२२ कोटींचा निधी : ७ हजार १६२ शेतकरी जोडणीच्या प्रतीक्षेत यवतमाळ : जिल्ह्यातील वीज वितरणासाठी पायाभूत सुविधांची उणीव आहे. त्यामुळेच ३० मार्च अखेरपर्यंत ७ हजार १६२ शेतकरी कृषी पंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना योग्य दाबाचा वीज पुरवठा देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत तब्बल १६ उपकेंद्रांची कामे प्रस्तावित केली आहे. त्यावर १२२ कोटी ९१ लाख खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याने सिंचनावर भर देण्यात आला. अनेक शेतकरी केवळ वीज जोडणी नसल्याने सिंचन करू शकत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाला. ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणी आहे, त्यांनाही योग्य दाबात वीज पुरवठा मिळत नसल्याने सिंचन करणे शक्य होत नाही. ही समस्या पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. आता यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून जिल्ह्याकरिता ७६२ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून ही कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये ३३ केव्ही उपकेंद्र, कार्यरत उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र उभारणे, ३३ केव्ही आणि ११ केव्ही वाहिन्या टाकणे, लघुदाब वाहिनी, वितरण रोहित्र याचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ कोटी ७० लाखांची कामे प्रस्तावित असून, त्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळातील रुईवाई, सावरगड, बाभूळगावात घारफळ, कोटंबा, दाभा, राळेगावमध्ये वडकी, आर्णी येथे मांगलादेवी, लोणी, सदोबा सावळी, पुसदमध्ये सावरगाव, उमरखेडमध्ये पोफाळी, मरसूळ, दारव्हा येथे वडगाव गाढवे, चाणी कामठवाडा, मानकिन्ही, दिग्रसमध्ये तिवरी, तुपटाकळी, महागावमध्ये अनंतवाडी, मुडाणा, पेंढी, मारेगावमध्ये करणवाडी, मार्डी झरीजामणीमध्ये माथार्जून, केळापूरमध्ये करंजी, बोरी, मोहदा, वणीमध्ये शिरपूर, साखरा, कायर-शिंदोला, घाटंजीमध्ये कुंभारी, नेरमध्ये शिरसगाव याठिकाणी वीज उपकेंद्र प्रस्तावित आहेत. त्याचेही काम सुरू आहे. जिल्ह्यात तब्बल ३० हजार ४०० घरगुती वीज मीटर बदलविण्यात येणार आहे. सुरळीत आणि शाश्वत वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्रह बदल प्रस्तावित आहे. त्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील मंजूर आरखड्यानुसार कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)