शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१६ गावांतील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:04 IST

पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले. नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : लोअर पूस प्रकल्प ठरला कुचकामी, महागाव तहसील कार्यालयासमोर नागरिकांचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले.नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे. पूस प्रकल्पातून पाणी मिळावे म्हणून १६ गावांतील नागरिक सतत संघर्ष करीत आहे. मात्र प्रकल्पाचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत आहे. उपाययोजना करण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुरूवारपासून येथील तहसीलसमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. पोहंडूळ, इजनी, तिवरंग, धनोडा, खडका, लेवा, वाघनाथ, बारभाई, राउतवाडी, काऊरवाडी, हिवरा, दहिसावळी, चिखली, मलकापूर, भोसा येथील नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहे.लोअर पूसमधून कालव्यात पाणी सोडावे म्हणून सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर इनामदार, माणिक गोमासे, गजानन खापरकर, जावेद चव्हाण, जयवंता जाधव, डॉ. विजय रावते, रमेश राठोड, संजय सोळंके यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी ७ डिसेंबर रोजी उपोषण केले होते. त्यावेळी पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आठ दिवसांनी उपोषणाची सांगता झाली. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. त्याचा निषेध म्हणून नागरिकांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.