शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 9:59 PM

कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली.

ठळक मुद्दे१९ जखमी : पांढरकवडा बायपास चौफुलीवरील पहाटेचा थरार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. या ट्रकचे चालक वाहक वाहन सोडून पसार झाले आहेत.मध्य प्रदेश आणि नागपूर येथून जनावरे घेऊन ट्रक (क्र.एम.पी.०९ - ८४१४) हैद्राबादकडे जात होता. सोमवारी पहाटे येथील पांढरकवडा चौफुलीवर ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात ट्रकमधील १६ जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर १९ जनावरे गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर हृदय हेलावणारे दृश्य दिसत होते. जनावरांच्या प्रेतांचा सडाच रस्त्यावर पडला होता. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ६ वाजतापासून अपघातग्रस्त ट्रकमधून जनावरे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हटकर व डॉ.वटाणे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून जनावरांवर उपचार सुरू केले. नगरपरिषदेच्या मदतीने मृत जनावरे घटनास्थळावरून हलविण्यात आली.या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात प्राणीसंरक्षण कायद्यानुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावर असलेले सहायक निरीक्षक विनोद झळके यांच्यासह ठाणेदार यशवंत बावीस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत कार्यास सुुरुवात केली.हप्तेखोरीच्या वादातून घडला अपघातजनावरे घेऊन जात असलेल्या ट्रकचा कळंबपासून आयटेन कार पाठलाग करीत होती. कत्तलीसाठी जाणाऱ्यां जनावरांना शहराबाहेर काढून देण्यासाठी काही टोळके राजरोसपणे हप्ते घेतात. एका ट्रिपला दहा ते वीस हजार रुपये आकारले जाते. हा ट्रक मडकोना येथून जात असताना या ट्रकमागे आयटेन कार लागली होती. यामध्ये काही तरुण चालकाला धमकावत होते. या धावपळीतच ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले तर पाठलाग करणारी आय-टेन कार गतिरोधकावर इंजीन आदळून जागेवरच बंद पडली. पोलिसांनी या कारच्या माध्यमातून तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.दारव्हा येथे ४७ जनावरांची सुटका, १२ अटकेत, २० लाखांचा मुद्देमालदारव्हा : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारी सहा वाहने पोलिसांनी पकडून ४७ जनावरांची सुटका तालुक्यातील हातोला येथे सोमवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. १२ जणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारव्हा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून हातोला येथे सोमवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी वाहनांची तपासणी केली असता सहा वाहनांमध्ये जनावरांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४७ जनावरांची सुटका केली. तर आरोपी साहेबराव विठ्ठलराव इंगोले (५०), फकीर मोहंमद शेख चाँद, एयाज खान मिराज खान (३०) सर्व रा. उमर्डा बाजार ता. कारंजा, शेख इकबाल शेख नूर (२०) रा. लोही, शेख अजीज शेख बशीर (६५), नईम खान कासम खान (२६), कासम खान फकीर खान (७२), हारुन खान रशीद खान (३६), शेख अन्वर शेख गुलाब (४२), शेख शहजाद शेख गुलाब (२९), शेख इर्शाद शेख रऊफ (३४), अलिम खान कासम खान (३६) सर्व रा. लोही यांना अटक करण्यात आली. तर शेख असफाक शेख कादीर (४७) रा. लोही पसार झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके, पीएसआय संदीप मुपडे, संतोष माने, प्रेमसिंग चव्हाण, कासम निम्सुरवाले, रोशन गुजर, केशव मुंढे, संजय साबळे आदींनी केली.