शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शासनाच्या खात्यांमध्ये १५०० कोटी अखर्चित निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 07:00 IST

कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व विभागांकडील अखर्चित निधी परत मागण्यात आला. राज्यात विविध विभागांच्या खात्यांमध्ये असा दीड हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु हा निधी नेमका कशा पद्धतीने परत करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी न केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देरोहयोचे १३५ कोटी वेगळे मार्गदर्शक तत्वांअभावी निधीचा परतावा अडचणीत ‘डीडीओं’ची कोंडी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व विभागांकडील अखर्चित निधी परत मागण्यात आला. राज्यात विविध विभागांच्या खात्यांमध्ये असा दीड हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु हा निधी नेमका कशा पद्धतीने परत करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी न केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे.राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी अखर्चित निधी ३० मेपर्यंत परत करण्याचे आदेश ४ मे रोजी जारी केले. निधी कोण्या हेडवर परत करावा हे स्पष्ट नाही. वित्त विभागानेही मार्गदर्शक तत्वे जारी केली नाही. त्यामुळे शासनाच्या २९ विभागांतर्गत राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहरण व सवितरण अधिकारी (डीडीओ) संभ्रमात सापडले. दुसरीकडे ३० मेपूर्वी अखर्चित निधी कोषागारात जमा करून खाते झिरो करा यासाठी विभाग प्रमुख तगादा लावत आहेत.

‘डीडीओं’नी मार्गदर्शन मागितलेकाही डीडीओंनी अखर्चित निधी परत करण्याची प्रक्रिया राबविली, चेक तयार केले तर काहींनी वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे.पाच ते दहा वर्षांपासूनचा निधीकाही खात्यांमध्ये पाच ते दहा वर्षांपासून हा निधी अखर्चित म्हणून नोंद आहे. केंद्र शासन, राज्य शासन, रोहयो, जिल्हा नियोजन समिती अशा वेगवेगळ्या हेडवरील हा निधी आहे. खात्यात आज हा निधी अखर्चित दिसत असला तरी लगतच्या भविष्यात तो कुणाची तरी देणे आहे. त्यामुळे आज हा निधी शासनाला परत केल्यास उद्या मागणाऱ्याला निधी द्यायचा कोठून असा प्रश्न आहे. एलआयसीचे धनादेश याच निधीतील एक प्रकार आहे. वर्षानुवर्षे अखर्चित म्हणून पडून असलेल्या या निधीवर शासनाला व्याज मिळते. व्याजाची ही रक्कम खात्यात कायम ठेवायची की शासनाकडे जमा करायची याबाबतही स्पष्ट आदेश नाहीत.

रोहयो मजुरांना पैसा द्यायचा कोठून ?रोजगार हमी योजनेचे १३५ कोटी पडून आहेत. रोजगाराच्या शोधात बाहेर जिल्ह्यात गेलेले मजूर कोरोनामुळे आपआपल्या जिल्ह्यात-गावात परतले आहेत. त्यांना रोजगार हमी योजनेवर कामे द्यायची आहेत. अखर्चित निधी शासनाला परत केल्यास त्यांना मजुरी द्यायची कोठून असा प्रश्न आहे. प्रत्येक डीडीओकडे शासनाचे चार ते पाच खाते आहेत. त्यात मार्च २०२० पर्यंत अखर्चित निधी पडून आहे.

कोषागाराचा निधी घेण्यास नकारमुख्य सचिवांच्या ४ मेच्या आदेशात निधी परताव्याबाबत सुक्ष्म व स्पष्ट मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे अनेक कोषागार कार्यालयांनी शासनाच्या विविध विभागातील अखर्चित निधी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वित्त विभागाच्या स्पष्ट सूचना आल्यानंतरच हा निधी स्वीकारला जाईल, असे डीडीओंना सांगितले जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १२ कोटीशासनाच्या विविध विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यालयांच्या बँक खात्यांमध्ये १२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. मात्र तो शासनाला नेमका कोणत्या पद्धतीने परत करावा याचे मार्गदर्शन न झाल्याने जिल्ह्यातील डीडीओ द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार