शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यात दीड लाख कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:19 IST

राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली.

ठळक मुद्देआयुक्तांचा धडाका : अर्धेअधिक ‘टार्गेट’ महिनाभरात पूर्ण

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे, एकूण लक्ष्यांकाच्या अर्ध्याहून अधिक झालेली ही नोंदणी केवळ महिनाभरात पूर्ण झाली आहे.बांधकाम कामगारांसाठी विविध सोयी सवलतीच्या योजना राज्य राबविल्या जातात. मात्र, अनेक कामगार नोंदणीच करीत नसल्याने ते लाभापासून वंचित राहतात. अशा स्थितीत मुळचे यवतमाळ येथील असलेले नरेंद्र पोयाम यांनी मुंबईत कामगार आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच नोंदणीच्या प्रक्रियेत सहजता आणली गेली. कामगारांपर्यंत नोंदणीबाबत माहिती पोहोचविण्यात आली. नोंदणीसाठी विविध ठिकाणी सुविधा देण्यात आली. त्यातून राज्यभरात एकंदर अडीच लाख बांधकाम कामगारांची नोंदणीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते.२३ फेब्रुवारी ते २३ मार्च या एका महिनाभराच्या कालावधीतच दीड लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. यात नागपूर विभागात २२ हजार ७१३, अमरावती विभागात १३ हजार ७१३, पुणे विभागात ३६ हजार ६७८, मुंबई विभागात ५८ हजार ४२०, नाशिक विभागात १० हजार ३३७ तर औरंगाबाद विभागात ९ हजार ९८० कामगारांची नोंदणी केली आहे.कामगारांसाठी आयुक्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमातराज्यभरातील कामगारांना योजनांची माहिती व्हावी यासाठी राज्याचे कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम आकाशवाणीवरून संवाद साधणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके यांनी आयुक्तांची मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुलाखत ३० आणि ३१ मार्चला सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होणार आहे. कामगार कल्याणाच्या योजना, नोंदणीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कामगारांच्या पाल्यांना दिले जाणारे लाभ आदींची माहिती यात आयुक्त पोयाम सांगणार आहेत.