शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

‘आयुष्यमान’चा १५ लाख लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:22 IST

सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

ठळक मुद्देमदन येरावार : ग्रामीण व शहरी भागातील कुटुंब पात्र, राष्ट्रीय शुभारंभाचे थेट प्रक्षेपण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण तीन लाख ८६ हजार५४४ कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास १५ लाख नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.नियोजन भवन येथे ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा’ शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी काही लोकांना मान्यवरांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे’ ई-कार्ड देण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांची (झारखंड) येथील या योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी सदर योजनेविषयीची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. संचालन प्रशांत पाटील यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, रेखा कोठेकर, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुकेश मारू, दर्शन चांडक, डॉ. टी.सी. राठोड आदी उपस्थित होते.