शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंट नसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला.

ठळक मुद्देधामणगाव रेल्वे व नांदेड रॅक पॉर्इंट : दोन्ही जिल्ह्यातील राजकीय दबाव ठरला वरचढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह््यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा असताना यवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा युरिया रॅक पॉईंटवरून परस्परच पळविला जात आहे. त्यासाठी राजकीय दांडगाई केली जात आहे. नुकताच धामणगाव रेल्वे व नांदेडच्या रॅकपॉईंटवरून यवतमाळच्या हक्काचा अनुक्रमे १२०० व २०० मेट्रिक टन युरिया पळविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंटनसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला. अमरावती व नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरुन यवतमाळ जिल्ह्याच्या युरियामध्ये आपला हक्क सांगून तो पळविला. ते पाहता अमरावती व नांदेडचे राजकीय नेते यवतमाळच्या नेत्यांवर भारी पडल्याचे दिसते. खुलेआम युरिया पळविला गेला असताना कृषी विभाग मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहे. राजकीय नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे शेजारील जिल्हे यवतमाळवर वरचढ ठरत आहेत.जिल्ह्यासाठी धामणगाव रॅकपॉईंटवर २४०० मेट्रिकटन युरिया आला होता. यातील १२०० मेट्रिक टन युरिया अमरावती जिल्ह्याने वळता केला. नांदेडच्या रॅकपॉईंटवर यवतमाळसाठी ३०० मेट्रिक टन युरिया पाठविण्यात आला होता. यातील केवळ १०० मेट्रिक टन युरियाच जिल्ह्याला मिळाला असून उर्वरित २०० मेट्रिक टन युरिया नांदेड जिल्ह्याने पळविला आहे.राजकीय नेते मंडळी विकासाच्या मुद्यांवर किंवा शासनाकडून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी रस्सीखेच करीत असल्याचे पाहिले गेले. परंतु युरियावर पहिल्यांदाच रस्सीखेच होत आहे. यावरून टंचाईची तीव्रता लक्षात येते.जिल्ह्यात प्रथमच विविध जिल्ह्यांच्या रॅकपॉईंटवरून खत येत आहे. ही रॅक अलोकेशननुसारच मिळत आहे. जिल्ह्याचा कोटा पळविला नाही. जिल्ह्याला संपूर्ण खत मिळाले आहे. आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. आता नव्याने खत मिळणार आहे. इतर ठिकाणी लॉकडाऊन असल्याने शेतकरी गर्दी करीत आहे. प्रत्येकाला युरिया मिळेल.- राजेंद्र घोंगडे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळपाऊस आला धावून शेतकऱ्यांच्या मदतीलायुरियामध्ये नायट्रोजन आहे आणि हवेतही नायट्रोजन आहे. पाण्याचा हवेशी संयोग होऊन नायट्रोजन जमिनीतील पिकांना आपोआप उपलब्ध होते. यामुळे युरियाची नैसर्गिक प्रक्रिया घडून पीक वाढते. जिल्ह्यात सतत पाऊस बरसत आहे. यातून पीक जोमाने वाढण्याची प्रक्रिया घडणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती