शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंट नसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला.

ठळक मुद्देधामणगाव रेल्वे व नांदेड रॅक पॉर्इंट : दोन्ही जिल्ह्यातील राजकीय दबाव ठरला वरचढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह््यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा असताना यवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा युरिया रॅक पॉईंटवरून परस्परच पळविला जात आहे. त्यासाठी राजकीय दांडगाई केली जात आहे. नुकताच धामणगाव रेल्वे व नांदेडच्या रॅकपॉईंटवरून यवतमाळच्या हक्काचा अनुक्रमे १२०० व २०० मेट्रिक टन युरिया पळविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंटनसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला. अमरावती व नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरुन यवतमाळ जिल्ह्याच्या युरियामध्ये आपला हक्क सांगून तो पळविला. ते पाहता अमरावती व नांदेडचे राजकीय नेते यवतमाळच्या नेत्यांवर भारी पडल्याचे दिसते. खुलेआम युरिया पळविला गेला असताना कृषी विभाग मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहे. राजकीय नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे शेजारील जिल्हे यवतमाळवर वरचढ ठरत आहेत.जिल्ह्यासाठी धामणगाव रॅकपॉईंटवर २४०० मेट्रिकटन युरिया आला होता. यातील १२०० मेट्रिक टन युरिया अमरावती जिल्ह्याने वळता केला. नांदेडच्या रॅकपॉईंटवर यवतमाळसाठी ३०० मेट्रिक टन युरिया पाठविण्यात आला होता. यातील केवळ १०० मेट्रिक टन युरियाच जिल्ह्याला मिळाला असून उर्वरित २०० मेट्रिक टन युरिया नांदेड जिल्ह्याने पळविला आहे.राजकीय नेते मंडळी विकासाच्या मुद्यांवर किंवा शासनाकडून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी रस्सीखेच करीत असल्याचे पाहिले गेले. परंतु युरियावर पहिल्यांदाच रस्सीखेच होत आहे. यावरून टंचाईची तीव्रता लक्षात येते.जिल्ह्यात प्रथमच विविध जिल्ह्यांच्या रॅकपॉईंटवरून खत येत आहे. ही रॅक अलोकेशननुसारच मिळत आहे. जिल्ह्याचा कोटा पळविला नाही. जिल्ह्याला संपूर्ण खत मिळाले आहे. आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. आता नव्याने खत मिळणार आहे. इतर ठिकाणी लॉकडाऊन असल्याने शेतकरी गर्दी करीत आहे. प्रत्येकाला युरिया मिळेल.- राजेंद्र घोंगडे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळपाऊस आला धावून शेतकऱ्यांच्या मदतीलायुरियामध्ये नायट्रोजन आहे आणि हवेतही नायट्रोजन आहे. पाण्याचा हवेशी संयोग होऊन नायट्रोजन जमिनीतील पिकांना आपोआप उपलब्ध होते. यामुळे युरियाची नैसर्गिक प्रक्रिया घडून पीक वाढते. जिल्ह्यात सतत पाऊस बरसत आहे. यातून पीक जोमाने वाढण्याची प्रक्रिया घडणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती