शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्याचा १४०० मेट्रिक टन युरिया पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंट नसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला.

ठळक मुद्देधामणगाव रेल्वे व नांदेड रॅक पॉर्इंट : दोन्ही जिल्ह्यातील राजकीय दबाव ठरला वरचढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह््यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा असताना यवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा युरिया रॅक पॉईंटवरून परस्परच पळविला जात आहे. त्यासाठी राजकीय दांडगाई केली जात आहे. नुकताच धामणगाव रेल्वे व नांदेडच्या रॅकपॉईंटवरून यवतमाळच्या हक्काचा अनुक्रमे १२०० व २०० मेट्रिक टन युरिया पळविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंटनसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच वळविला जातो. युरियाबाबत अलिकडेच दोन रॅक पॉईंटवर हा प्रकार घडला. अमरावती व नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरुन यवतमाळ जिल्ह्याच्या युरियामध्ये आपला हक्क सांगून तो पळविला. ते पाहता अमरावती व नांदेडचे राजकीय नेते यवतमाळच्या नेत्यांवर भारी पडल्याचे दिसते. खुलेआम युरिया पळविला गेला असताना कृषी विभाग मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहे. राजकीय नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे शेजारील जिल्हे यवतमाळवर वरचढ ठरत आहेत.जिल्ह्यासाठी धामणगाव रॅकपॉईंटवर २४०० मेट्रिकटन युरिया आला होता. यातील १२०० मेट्रिक टन युरिया अमरावती जिल्ह्याने वळता केला. नांदेडच्या रॅकपॉईंटवर यवतमाळसाठी ३०० मेट्रिक टन युरिया पाठविण्यात आला होता. यातील केवळ १०० मेट्रिक टन युरियाच जिल्ह्याला मिळाला असून उर्वरित २०० मेट्रिक टन युरिया नांदेड जिल्ह्याने पळविला आहे.राजकीय नेते मंडळी विकासाच्या मुद्यांवर किंवा शासनाकडून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी रस्सीखेच करीत असल्याचे पाहिले गेले. परंतु युरियावर पहिल्यांदाच रस्सीखेच होत आहे. यावरून टंचाईची तीव्रता लक्षात येते.जिल्ह्यात प्रथमच विविध जिल्ह्यांच्या रॅकपॉईंटवरून खत येत आहे. ही रॅक अलोकेशननुसारच मिळत आहे. जिल्ह्याचा कोटा पळविला नाही. जिल्ह्याला संपूर्ण खत मिळाले आहे. आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. आता नव्याने खत मिळणार आहे. इतर ठिकाणी लॉकडाऊन असल्याने शेतकरी गर्दी करीत आहे. प्रत्येकाला युरिया मिळेल.- राजेंद्र घोंगडे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळपाऊस आला धावून शेतकऱ्यांच्या मदतीलायुरियामध्ये नायट्रोजन आहे आणि हवेतही नायट्रोजन आहे. पाण्याचा हवेशी संयोग होऊन नायट्रोजन जमिनीतील पिकांना आपोआप उपलब्ध होते. यामुळे युरियाची नैसर्गिक प्रक्रिया घडून पीक वाढते. जिल्ह्यात सतत पाऊस बरसत आहे. यातून पीक जोमाने वाढण्याची प्रक्रिया घडणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती