शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

14 हजार बालकांना हवा मायेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

जिल्ह्याने कोरोनाच्या प्रकोपाचा सामना केला आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा आधार असलेले ३४८ पालक मृत्यूमुखी पडले आहे. या पालकांची मुले आता छत्र हरविल्याने एकाकी पडले आहेत. यातील चार बालकांचे माता-पिता राहिले नाही. तर इतर बालके एक पालकाच्या छत्रछाये खाली आहेत. 

ठळक मुद्देसर्वेक्षणातून धक्कादायक माहिती : कोविडने ३४८ बालकांचे छत्र हिरावले, शासन देणार दिलासा

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविडच्या प्रकोपाने  समाज जीवनात मोठी उलथापालथ केली आहे. कोविड संकटाने अनेक बालकांचे आई-वडील हिरावले आहेत.  प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात कोविडमुळे आई किंवा वडिलांपैकी एक जण गमाविलेल्या बालकांची संख्या ३४८ एवढी आहे. तर इतर कारणांमुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या १४ हजार एवढी आहे. या पोरक्या मुलांचे आता सरकारलाच मायबाप व्हावे लागणार आहे. प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात ३४८ बालकांच्या संगोपनाचा खर्च सरकार उचलणार आहे. जिल्ह्याने कोरोनाच्या प्रकोपाचा सामना केला आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा आधार असलेले ३४८ पालक मृत्यूमुखी पडले आहे. या पालकांची मुले आता छत्र हरविल्याने एकाकी पडले आहेत. यातील चार बालकांचे माता-पिता राहिले नाही. तर इतर बालके एक पालकाच्या छत्रछाये खाली आहेत. अनेकांचे आई-वडील महामारीत गमावल्या गेले. त्यांच्या कुटुंबात कमावता व्यक्ती राहिला नाही. तर काही कुटुंबात आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने उरलेल्या एकावर संगोपनाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली असल्याचे महिला बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षण मोहिमेत ३४८ बालके छत्रछाया नसल्याचे पुढे आले. यासोबतच १३ हजार ३३३ बालकांना एक पालक असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. अशा बालकांसाठी महिला बाल कल्याण विभागाची बालसंगोपन निधी योजना राबविण्यात येते. बाल संगोपन समिती त्यासाठी शिफारस करते. बालकाच्या शिक्षणासाठी महिन्याला ११०० रुपये दिले जातात. तर दोन पालक हरविलेल्या बालकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मदत निधी मिळतो.  पहिल्या टप्प्यात २४५ बालके आहेत. 

विविध विभागाकडून चाचपणी - महिला बाल कल्याण विभागाकडून बाल संगोपन निधी दिला जातो. कोविडच्या अनुषंगाने त्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनाथ बालकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्याने अशा एक पालक असणाऱ्या बालकांसाठी कुठल्या उपाययोजना करता येतात या दृष्टीने प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग, खनिकर्म विभाग, मानव विकास मिशन विभाग, जिल्हा नियोजन समिती या ठिकाणावरून तरतुदीबाबत विचार होत आहे. 

- एक पालक असलेल्या कुटुंबामध्ये आर्थिक हातभार लागावा याकरिता कौशल्य विकास योजनेमधून अशा पालकांना विविध विषयाचे प्रशिक्षण देता येईल का याबाबतही विचार केला जात आहे. व्यवसायाकरिता इच्छुक असणाऱ्या पालकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विचार केला जात आहे. 

कोविडमुळे माता-पिता हरविलेल्या बालकांचा शोध घेताना या व्यतिरिक्त एक पालक असणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यामधून हा आकडा पुढे आला आहे. बाल संगोपन निधीतून मदत दिली जाणार आहे. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या बालकांची माहिती घेतली जाणार आहे. - अमोल येडगे जिल्हाधिकारी, यवतमाळ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या