शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

14 हजार बालकांना हवा मायेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

जिल्ह्याने कोरोनाच्या प्रकोपाचा सामना केला आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा आधार असलेले ३४८ पालक मृत्यूमुखी पडले आहे. या पालकांची मुले आता छत्र हरविल्याने एकाकी पडले आहेत. यातील चार बालकांचे माता-पिता राहिले नाही. तर इतर बालके एक पालकाच्या छत्रछाये खाली आहेत. 

ठळक मुद्देसर्वेक्षणातून धक्कादायक माहिती : कोविडने ३४८ बालकांचे छत्र हिरावले, शासन देणार दिलासा

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविडच्या प्रकोपाने  समाज जीवनात मोठी उलथापालथ केली आहे. कोविड संकटाने अनेक बालकांचे आई-वडील हिरावले आहेत.  प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात कोविडमुळे आई किंवा वडिलांपैकी एक जण गमाविलेल्या बालकांची संख्या ३४८ एवढी आहे. तर इतर कारणांमुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या १४ हजार एवढी आहे. या पोरक्या मुलांचे आता सरकारलाच मायबाप व्हावे लागणार आहे. प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात ३४८ बालकांच्या संगोपनाचा खर्च सरकार उचलणार आहे. जिल्ह्याने कोरोनाच्या प्रकोपाचा सामना केला आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा आधार असलेले ३४८ पालक मृत्यूमुखी पडले आहे. या पालकांची मुले आता छत्र हरविल्याने एकाकी पडले आहेत. यातील चार बालकांचे माता-पिता राहिले नाही. तर इतर बालके एक पालकाच्या छत्रछाये खाली आहेत. अनेकांचे आई-वडील महामारीत गमावल्या गेले. त्यांच्या कुटुंबात कमावता व्यक्ती राहिला नाही. तर काही कुटुंबात आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने उरलेल्या एकावर संगोपनाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली असल्याचे महिला बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षण मोहिमेत ३४८ बालके छत्रछाया नसल्याचे पुढे आले. यासोबतच १३ हजार ३३३ बालकांना एक पालक असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. अशा बालकांसाठी महिला बाल कल्याण विभागाची बालसंगोपन निधी योजना राबविण्यात येते. बाल संगोपन समिती त्यासाठी शिफारस करते. बालकाच्या शिक्षणासाठी महिन्याला ११०० रुपये दिले जातात. तर दोन पालक हरविलेल्या बालकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मदत निधी मिळतो.  पहिल्या टप्प्यात २४५ बालके आहेत. 

विविध विभागाकडून चाचपणी - महिला बाल कल्याण विभागाकडून बाल संगोपन निधी दिला जातो. कोविडच्या अनुषंगाने त्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनाथ बालकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्याने अशा एक पालक असणाऱ्या बालकांसाठी कुठल्या उपाययोजना करता येतात या दृष्टीने प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग, खनिकर्म विभाग, मानव विकास मिशन विभाग, जिल्हा नियोजन समिती या ठिकाणावरून तरतुदीबाबत विचार होत आहे. 

- एक पालक असलेल्या कुटुंबामध्ये आर्थिक हातभार लागावा याकरिता कौशल्य विकास योजनेमधून अशा पालकांना विविध विषयाचे प्रशिक्षण देता येईल का याबाबतही विचार केला जात आहे. व्यवसायाकरिता इच्छुक असणाऱ्या पालकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विचार केला जात आहे. 

कोविडमुळे माता-पिता हरविलेल्या बालकांचा शोध घेताना या व्यतिरिक्त एक पालक असणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यामधून हा आकडा पुढे आला आहे. बाल संगोपन निधीतून मदत दिली जाणार आहे. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या बालकांची माहिती घेतली जाणार आहे. - अमोल येडगे जिल्हाधिकारी, यवतमाळ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या