शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १४ रुग्ण, एकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:16 IST

विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशेजारी जिल्ह्यातील रुग्णांची धाव : वाशीम डीएचओला अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यावरून वाशीमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक खबरदारीसाठी यवतमाळातून अलर्ट देण्यात आला आहे. वणी तालुक्यात स्क्रब टायफसने एकाचा अलिकडेच बळी गेला आहे.गेल्या महिनाभरापासून राज्यात स्क्रब टायफस आजार वाढत आहे. विदर्भात आतापर्यंत या आजाराने १२ जणांचे बळी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सजग राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर १४ रुग्णांना स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील १२ रुग्ण हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्यातील २ शहरी भागातील तर १० जण ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. शिवाय, वाशीम जिल्ह्यातील दोन रुग्ण सध्या यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाले आहेत. तर परजिल्ह्यातील ३-४ रुग्ण यापूर्वीच यवतमाळात बरे होऊन परतले आहेत. दरम्यान गुंज (ता. महागाव) येथील महिलेला स्क्रब टायफस झाल्याने यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल केले.या आजारात सुरवातीला ताप येतो. असे रुग्ण ग्रामीण आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांच्या रक्ताची शिरॉलॉजिक टेस्ट झाल्याशिवाय स्क्रब टायफसचे निदान होऊ शकत नाही. ही रक्त चाचणी केवळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. तर वाशीमसारख्या जिल्ह्यातूनही काही रुग्ण आले आहेत. त्यामुळे यवतमाळ मेडिकलने वाशीमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने पत्र पाठवून दक्षता घेण्याबाबत सजग केले आहे. या पत्राचा हवाला देत वाशीम डीएचओंनी साथरोग नियंत्रणासाठी पथके तयार केली आहेत.घरगुती उपचारदूधात हळद टाकून प्यावे. मेथीची पाने पाण्यात भिजवून गाळून पाणी प्यावे. मेथी पावडरही पाण्यात टाकून घेता येते. या उपचारांनी ताप नियंत्रित करता येतो. तसेच शरीराच्या वेदना कमी होण्यास मदत होते.डॉक्टर म्हणतात, घाबरू नयेस्क्रब टायफस बरा होऊ शकतो. त्याला घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी आवश्यक असलेली डॉक्सीसायक्लीन ही गोळीही सहज उपलब्ध असून स्वस्तही आहे, अशी दिलासादायक माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी दिली.स्क्रब टायफस म्हणजे नेमके काय ?साधारणत: पाण्याचा साठा असलेल्या जागी वाढणाºया ‘ओरिएंटा सुसुगामुशी’ नामक ‘माईटस’च्या (किड्याच्या) चावण्यामुळे हा आजार होतो. पावसाळी वातावरणात जंगल, शेत आणि दाट गवताच्या ठिकाणी हे किडे वाढतात. किडा चावल्यावर त्याच्या लाळेतील ‘रिक्टशिया सुसुगामुशी’ हा घातक जंतू मानवी रक्तात पसरतो. त्यामुळे यकृत, मेंदू आणि फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. विशिष्ट प्रकारच्या रक्त तपासणीतूनच या आजाराचे निदान होऊ शकते. या आजाराचा उपचार अँटी रिकेटशिअल औषधांनी केला जातो. डॉक्सीसायक्लीन टॅबलेट दिल्या जातात. या आजाराबाबत योग्य माहिती घेऊनच उपचार करावा, असे आवाहन केले गेले.ही आहेत आजाराची लक्षणेकिडा चावलेल्या ठिकाणी काळा डाग पडतो.रुग्णाला प्रचंड ताप येतो.शरिरात कमजोरी वाढते.मांसपेशींमध्ये वेदना होतात.भूक कमी होते, पोट बिघडते.गंभीर अवस्थेत प्लेटलेट्सची संख्याही घटते.

अशी घ्यावी दक्षताघराच्या आजूबाजूला झुडूपे वाढू न देणे.दाट गवतात जाऊ नये, गेल्यास बुट, ग्लोव्हज घालावे.शेतात काम करताना पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे.घराच्या परिसरात डबके साचू देऊ नये.डीडीटी सारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी.- २-३ दिवस सतत ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्य