शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

१४ गावांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST

पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देपैनगंगा अभयारण्य : मूलभूत सुविधांपासून वंचित

आॅनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा अभयारण्यात राहणारे नागरिक स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आतापर्यंत प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली. परंतु समस्या सुटल्या नाही. आता अभयारण्यातील १४ गावातील नागरिकांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यातील बंदीभागात १४ गावांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहे. त्यात बिटरगाव, पिंपळगाव, गणेशवाडी, जेवली, मुरली, सोनदाभी, मथूरानगर, मोरचंडी, एकंबा, जवराळा, परोटी, गाडी, बोरी, खरबी, दराटी, चिखली या गावांचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. आता आरपारची लढाई लढण्यासाठी जेवली येथे सत्याग्रही परशराम पिलवंड यांच्या स्मारकावर २९ डिसेंबर रोजी १४ गावातील नागरिक एकत्र आले. याभागातील समस्या सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीला माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर पांढरे, प्रकाश पेंदे, जीवन फोपसे, गजानन कोल्हे, डॉ.भगवान देवसरकर, मारोती पिलवंड, जीवन कदम, प्रमोद राठोड, हनुमंत पिलवंड, संतोष खुपसे, उत्तम पांडे, श्रावण गायकवाड, राजू देवसरकर, रवी कलाले, धम्मपाल इंगोले आदी उपस्थित होते. आता समस्या सोडविण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.प्रशासनाचे कायम दुर्लक्षपैनगंगा अभयारण्यात राहणाऱ्या १४ गावातील नागरिकांना मुलभूत सुविधाही मिळत नाही. रस्ते अभयारण्याच्या जाचक अटीत रखडले आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आदी सुविधा मिळत नाही. याभागातील आदिवासी वनउपजावर आपला चरितार्थ चालवित होते. परंतु आता त्यावरही निर्बंध आणले आहे. डिंक, चारोळी, मोहफूल, बांबू, तेंदुपत्ता यावर स्वामित्व मिळविण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे.