शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गारपीटग्रस्तांना १४ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:15 IST

गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला.

ठळक मुद्देतातडीने वाटप : जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला १४ कोटी तीन लाख ३१ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी हा निधी ६ मार्चला प्राप्त झाला. हा निधी लगेच तालुक्यांना वितरित करण्यात आला. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.जिल्ह्यात १२ आणि १३ फेब्रुवारीला गारपिटीने ११ हजार ९0 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात आठ हजार ३२९ हेक्टवरील पिकांचे ३३ ते ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. दोन हजार ७६१ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केच्यावर नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच तो शासनाकडे पाटविला. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून १४ कोटी तीन लाख ३१ हजार रूपये प्राप्त झाले.या निधीचे तातडीने वाटप तातडीने करून तसा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.अशी आहे तालुकानिहाय मदतयवतमाळ तालुक्याला एक कोटी ८३ लाख १९ हजार, कळंब १५ लाख ९७ हजार ५००, राळेगाव १७ लाख तीन हजार ७००, बाभूळगाव एक कोटी ४३ लाख ८१ हजार ५५, मारेगाव ६६ लाख ४४ हजार २२०, तर केळापूर तालुक्यातील शेतकºयांना २३ लाख ३९ हजार ७७५ रूपये मिळणार आहे. घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना ६४ लाख ५१ हजार, आर्णी एक कोटी ३८ लाख पाच हजार, दारव्हा तीन कोटी ६९ लाख १८ हजार, नेर १२ लाख ८२ हजार, पुसद एक कोटी ९८ लाख ३४ हजार, उमरखेड एक कोटी तीन लाख १७ हजार आणि महागाव तालुक्यातील शेतकºयांना ७३ लाख ३५ हजार रूपयांची मदत मिळणार आहे.