शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

कोविड सेंटरच्या १३३९ कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

काम करून आम्ही सेवेत नियमित होण्यासाठी पात्र ठरलो आहोत. आता सरळसेवा भरतीत ज्यांनी संकटाच्या काळात घरी बसून परीक्षेची तयारी केली, अशांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. कामाचा अनुभव असूनही यातून संधी मिळणे कठीण आहे. जिल्ह्यात आरोग्य अभियानांतर्गत ११ महिन्यांचा आदेश असलेले ९९१ आरोग्य कर्मचारी आहेत. तर कोविड केअर सेंटर येथे तीन महिन्यांच्या आदेशाने कार्यरत असलेले १२३ आणि डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल येथे सेवा देणारे २२५ आरोग्य कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देकोरोना काळात बजावले कर्तव्य : शासनाने दखल घेत द्यावा न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. आरोग्य यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे कोरोना महामारीने अधोरेखित केले आहे. अनेक जण घरात दडले असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. आता त्यांची उपयोगिता संपल्याने त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार होत आहे. शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेऊन आरोग्य विभागातील पदभरतीमध्ये कंत्राटी सेवा देणाऱ्यांसाठी जागा आरक्षित ठेवाव्या, अशी मागणी होत आहे. काम करून आम्ही सेवेत नियमित होण्यासाठी पात्र ठरलो आहोत. आता सरळसेवा भरतीत ज्यांनी संकटाच्या काळात घरी बसून परीक्षेची तयारी केली, अशांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. कामाचा अनुभव असूनही यातून संधी मिळणे कठीण आहे. जिल्ह्यात आरोग्य अभियानांतर्गत ११ महिन्यांचा आदेश असलेले ९९१ आरोग्य कर्मचारी आहेत. तर कोविड केअर सेंटर येथे तीन महिन्यांच्या आदेशाने कार्यरत असलेले १२३ आणि डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल येथे सेवा देणारे २२५ आरोग्य कर्मचारी आहेत. या सर्वांनी पूर्णवेळ व तुटपुंज्या मानधनावर संकटाच्या काळात प्रशासकीय यंत्रणेसोबत काम केले. किमान त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सेवेत नियमित करण्यासाठी काही सवलती द्याव्या, अशी माफक अपेक्षा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. येत्या काळात आरोग्य विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अशा स्थितीत संकटात धावून येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार शासनाने करावा, एकूण भरती प्रक्रियेतील ७५ टक्के जागा आरक्षित ठेवाव्या, त्यांचीही परीक्षा घेऊनच नियुक्ती द्यावी तर सरळसेवेकरिता २५ टक्के जागा ठेवून त्यातून नव्या उमेदवारांना नियुक्ती दिली जावी, या पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करता येईल, असा सूर आहे. शासनाचे धोरण सध्या ‘गरज सरो वैद्य मरो’ या स्वरूपाचे आहे. यामुळेच आरोग्य विभागातील यंत्रणा अजूनही खिळखिळी झालेली आहे. कोरोनाच्या काळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना कोरोनावर मात करता आली. मात्र आता हेच कर्मचारी संकटात सापडले आहे. 

कंत्राटी स्टाफ कामावर नसल्यामुळे बेरोजगारकोरोना काळात तीन महिन्यांची ऑर्डर देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर १२३, तर जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर २२५ परिचारिका व आरोग्य सेवक यांना कामाला लावले. आता कोरोनाचा जोर कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑर्डर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 

कोविड सेंटरमध्ये पूर्णवेळ कंत्राटी कर्मचारीच सेवेत जिल्ह्यात कोरोना महामारीच्या संकटात ३८ कोविड केअर सेंटर उघडण्यात आले. यासोबत डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल होते. या संकटात नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर दिवसरात्र राबत होते. जिल्ह्यात जवळपास एक हजार ३३९ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोनात फ्रन्ट लाइन वाॅरिअर म्हणून आपली सेवा दिली. या मोबदल्यात शासनाकडून त्यांना कुठल्याच सोई-सुविधा मिळाल्या नाहीत. संकटाच्या काळात केलेल्या कर्तव्याची दखल शासनाने घ्यावी इतकीच माफक अपेक्षा या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे.

कोरोनासाठी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा घेण्यात आल्या. तीन महिन्याची ऑर्डर देण्यात आली. आता यातील बहुतांश जण डिसेंबरनंतर बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना शासनाने न्याय द्यावा.    - जयश्री पाठक, कंत्राटी परिचारिका. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

कोविड सेंटरमध्ये काम केलेल्यांना सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे. 

कोरोना काळात केवळ परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी २५ टक्केच जागा ठेवा. 

कंत्राटी म्हणून दहा ते बारा वर्षांपासून सेवा दिली. त्याची दखल घ्यावी. 

वेतन सुसूत्रीकरणाचा प्रश्न निकाली काढून लाभ द्या. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या