शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

बहेलिया टोळीचे १३ सदस्य वन विभागाच्या ताब्यात

By admin | Updated: January 24, 2016 02:19 IST

मध्य प्रदेशात शिकारी व गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहेलिया टोळीच्या सशस्त्र १३ सदस्यांना तेलंगणा सीमेवरील टिपेश्वर अभयारण्य परिसरात ताब्यात घेण्यात आले.

टिपेश्वर अभयारण्य : शिकारीच्या तयारीत, १६ मोबाईल, बंदूक, आठ सत्तूर, वाहने जप्तप्रवीण पिन्नमवार पांढरकवडामध्य प्रदेशात शिकारी व गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहेलिया टोळीच्या सशस्त्र १३ सदस्यांना तेलंगणा सीमेवरील टिपेश्वर अभयारण्य परिसरात ताब्यात घेण्यात आले. पट्टेदार वाघाची शिकार करण्याच्या उद्देशाने ही टोळी आली होती का, या दृष्टीने वन विभागाची यंत्रणा तपास करीत आहे. या टोळीच्या ताब्यातून आठ मेटॅडोअर, छर्ऱ्याची बंदूक, आठ धारदार सत्तूर, १६ मोबाईल, हाडाचे तुकडे आदी साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारपासूनच या टोळीवर वन अधिकाऱ्यांची पाळत होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शनिवारी दुपारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान शस्त्रे आढळून आली. राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर टिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी कोपा मांडवी गावाजवळ या टोळीला ताब्यात घेण्यात आले. बिरसूसिंग बदनसिंग चितोरिया, चंद्रभानसिंग गिदरमानसिंग चितोरिया, किसन बदनसिंग चितोरिया, किसनसिंग छेदीसिंग चितोरिया, गोविंदसिंग किसनसिंग चितोरिया, राजेशसिंग श्यामसिंग सिंग, मंगलसिंग कतारसिंग चितोरिया, श्यामसिंग बदनसिंग चितोरिया अशी या टोळी सदस्यांची नावे आहेत. ते सर्व मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याचे रहिवासी आहेत. सुमारे १८ पट्टेदार वाघांचे अस्तित्व असलेल्या टिपेश्वर अभयारण्याशेजारी या टोळीने शुक्रवारी सायंकाळी आश्रय घेतल्याने वन अधिकाऱ्यांचा संशय बळावला. मध्य प्रदेशात ही टोळी वन्यजीवांच्या शिकारीत एक्सपर्ट मानली जाते. या टोळीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही कारवाया आहेत का, याच्या तपासणीसाठी त्यांची माहिती मेळघाटच्या सायबर सेलला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त कागदपत्रेही या सेलला पाठविण्यात आली. पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी या बहेलिया टोळीच्या सदस्यांना ‘प्रसाद’ दिल्याचेही सांगितले जाते. वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक बी.जी. राठोड, टिपेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे, वाडे, मेहरे आदी या टोळीची चौकशी करीत आहे. वन विभागाने वृत्तलिहिस्तोवर त्यांना अटक केलेली नव्हती. धार्मिक कार्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही हैदराबादला गेलो होतो, जडीबुटीद्वारे औषधी बनवून ती विकण्याचा आमचा व्यवसाय असल्याचे या टोळीने वन विभागाला सांगितले. मात्र वन अधिकाऱ्यांचे त्यामुळे समाधान झाले नाही, म्हणूनच त्यांची मेळघाट व मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात खातरजमा केली जात आहे. टिपेश्वर अभयारण्याशेजारी आश्रय घेण्यामागे या टोळीचा नेमका हेतू काय? त्यांचे क्राईम रेकॉर्ड आहे का? या मुद्यांवर वन खात्याची चौकशी सुरू आहे. डीएफओ जी. गुरूप्रसाद स्वत: चौकशी करीत असल्याचे सांगितले जाते.